औरंगाबाद जिल्ह्याकरिता दिनांक १६ ते २० सप्टेंबर २०२३ साठी हवामान अंदाज व कृषि हवामान सल्ला
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार औरंगाबाद जिल्हयात पुढील पाच दिवसात आकाश ढगाळ राहून दि. १६ व १७ सप्टेंबर २०२३ रोजी ब-यापैकी व्यापक प्रमाणात मध्यम तर दि. १८ ते २० सप्टेंबर २०२३ रोजी तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान २९.० ते ३१.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान १९.० ते २१.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ६१ ते ९० टक्के राहील तर वाऱ्याचा वेग १६ ते २७ किमी/तास राहण्याची शक्यता आहे.
सतर्कता:
औरंगाबाद जिल्हयात दि. १५ व १६ सप्टेंबर २०२३ रोजी तुरळक ठिकाणी वादळीवारा व विजेच्या
कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता असुन वा-याचा वेग जास्त (३० ते ४० किमी/तास)
राहण्याची शक्यता आहे.
विस्तारित अंदाजानुसार
(ईआरएफएस) औरंगाबाद जिल्हयात दिनांक २० ते २६ सप्टेंबर २०२३ दरम्यान आकाश अंशत:ढगाळ
ते ढगाळ राहील. तसेच पर्जन्यमान सरासरीपेक्षा जास्त तर कमाल तापमान व किमान तापमान
सरासरी ऐवढे राहण्याची शक्यता आहे.
कृषि
हवामान सल्ला
ऊस
वाढीची अवस्था
शेतकरी
बांधवानी पावसाचा अंदाज लक्षात घेता फवारणीची कामे पुढे ढकलावीत. तसेच ढगाळ
वातावरणामुळे ऊस पिकामध्ये पांढऱ्या माशीचा प्रादूर्भाव वाढण्याची शक्यता आहे
यासाठी पिकात पिवळे चिकट सापळे लावावेत.
कापुस
पाते लागणे ते बोंड धरणे
शेतकरी
बांधवानी पावसाचा अंदाज लक्षात घेता कापुस पिकातील फवारणीची कामे पुढे ढकलावीत. तसेच कापुस पीकावरील गुलाबी/शेंदरी
बोंडअळीच्या प्रादूर्भावावर लक्ष
ठेवावे. त्यासाठी प्रति हेक्टरी ५ कामगंध सापळे लावावेत. कापुस पिकातील डोमकळया
दिसल्यास वेचून नष्ट कराव्यात. तसेच
मागील आठवडयातील ढगाळ वातावरणामुळे कापुस पिकावर रस शोषण करणाऱ्या किडींचा (मावा, फुलकिडे,
पांढरी माशी) प्रादूर्भाव दिसून येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी ॲसीटामिप्रीड २० टक्के ३० ग्रॅम किंवा थायमिथॉक्झाम
२५ टक्के ४० ग्रॅम किंवा फलोनिकॅनीड ५० टक्के ६० ग्रॅम प्रति एकर पावसाची उघाड बघुन
स्वच्छ वातावरणात पावसाची उघाड बघून फवारणी करावी.
मका
दाणे भरणे ते कणसे वाढीची
अवस्था
शेतकरी
बांधवानी पावसाचा अंदाज लक्षात घेता मका पिकातील फवारणीची कामे पुढे ढकलावीत. तसेच
मका पिकावरील लष्करी अळीचा
प्रादुर्भाव ओळखन्यासाठी एकरी २० कामगंध सापळे लावावेत. तसेच सध्यस्थितीत मका पिकाची वाढ झालेली असल्यामुळे मका पीकावरील
लष्करी अळीच्या व्यवस्थापनासाठी रासायनिक फवारणी करण्याऐवजी जैविक पध्दतीने किडव्यवस्थापन
करण्याकरीता मेटारायझियम ऍनिसोपली ५० ग्रॅम किंवा नोमुरीया रिलाई ५० ग्रॅम प्रति
१० लिटर पाण्यात मिसळून पावसाने उघाड दिल्यास
स्वच्छ वातावरणात फवारणी करावी.
तुर
फांद्या लागणे अवस्था
शेतकरी
बांधवानी पावसाचा अंदाज लक्षात घेता तुर पिकातील फवारणीची कामे पुढे ढकलावीत. तसेच
तुर
पिकामध्ये मर व करपा (फायटोप्थोरा ब्लाईट) रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता
असल्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून एलिएट पावडर २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात
मिसळुन पावसाची उघाड बघुन आळवणी करावी.
मुग/उडीद
काढणी अवस्था
काढणीस तयार असलेल्या मुग/उडीद पीकाची काढणी पुढे ढकलावी. तसेच काढणी केलेल्या शेंगा कोरडया व सुरक्षित ठिकाणी वाळविण्यासाठी
टाकाव्यात.
सिताफळ
फळवाढीची अवस्था
शेतकरी बांधवानी पावसाचा अंदाज लक्षात घेता सीताफळ बागेतील फवारणीची कामे
पुढे ढकलावीत.
भाजीपाला
फुलधारणा ते फळधारणा
शेतकरी
बांधवानी पावसाचा अंदाज लक्षात घेता भाजीपाला पिकातील फवारणीची कामे पुढे ढकलावीत.
तसेच
काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची काढणी करून घ्यावी. तसेच मागील आठवड्यातील
ढगाळ वातावरणामुळे मिरची पिकावरील रस शोषण करणा-या (फुलकीडे,मावा) किडीच्या
व्यवस्थापनासाठी फिप्रोनिल ५ टक्के एससी २० मिली
प्रति १० लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघुन फवारणी करावी.
पशुसंवर्धन
पुढील पाच
दिवसांचा हवामानाचा अंदाज पाहता शेतकरी बांधवांनी आपले पशुधन झाडाखाली, पाणवठयाजवळ
किंवा लोखंडी अवजारांना न बांधता सुरक्षित ठिकाणी बांधावेत. तसेच जोरदार पावसाच्या
अनुषंगाने गोठयांची डागडूजी करुन घ्यावी. पाऊस चालू असतांना जनावरांना बाहेर
चरावयास सोडू नये.
गोवंशीय
पशुधनामध्ये लम्पीस्कीनचा प्रादूर्भाव दिसून येत आहे. यात लहान वयातील वासरांमध्ये
रोगाचा प्रादूर्भाव होवून मृत्युचे प्रमाण अधिक आहे. याच्या नियंत्रणासाठी व
पशुधनातील प्रतिकारशक्ती वाढविण्याकरीता लहान वासरांना चिक पाजावा, वयाच्या
सातव्या दिवशी जंतनाशक औषधींची मात्रा द्यावी व त्याप्रमाणे वेळेवर लसीकरण करावे,
जनावरांमध्ये आजारी व निरोगी जनावरे असे विलगीकरण करावे व त्यांच्या चारा पाण्याची
स्वतंत्र व्यवस्था करावी तसेच यामध्ये वरील उपायांसोबत पशुधनाची जास्तीत जास्त काळजी
घेणे गरजेचे आहे.
इतर
शेतकरी बांधवानी पावसाचा अंदाज लक्षात घेता
फवारणीची व काढणीची कामे पुढे ढकलावीत. तसेच शेतात लवकर वापसा व्हावी यासाठी पिकात व फळबागेत पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी व
अतिरिक्त साचलेल्या पाण्याचा निचरा होईल अशी व्यवस्था करावी.
Comments
Post a Comment