छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक १८ ते २२ जानेवारी २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात हवामान मुख्यत: कोरडे व स्वच्छ ते अंशत:ढगाळ राहील. तसेच कमाल तापमान २८.८ ते ३२.१ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान १८.८ ते १९.८ अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता १३ ते ४५ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग ०८ ते १४ किमी/तास राहण्याची शक्यता आहे.
विस्तारित
अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दि. २२ ते २८
जानेवारी २०२५ दरम्यान हवामान कोरडे राहुन आकाश स्वच्छ ते अंशतः ढगाळ राहील. तसेच
पर्जन्यमान सरासरीपेक्षा कमी तर कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान
सरासरी ऐवढे राहण्याची शक्यता आहे.
कृषि
हवामान सल्ला
ऊस
फुटवे अवस्था ते कांडे धरणे
मागील आठवड्यातील तापमानातील चढउतारामुळे ऊस
पिकामध्ये लोकरी माव्याचा प्रादुर्भाव दिसून येत असून याच्या व्यवस्थापनासाठी
डायमिथोएट ३० टक्के १५ मिली किंवा इमिडाक्लोप्रिड १७.८ टक्के ३० मिली किंवा
क्लोरोपायरीफॉस २० टक्के ३० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
कापूस
वेचणी ते काढणी अवस्था
शेतकरी बांधवानी फरदड घेणे टाळावे. गुलाबी बोंडअळीचा
प्रादुर्भाव रोखण्यासाठी उभी कपाशी कॉटन श्रेडरच्या साहाय्याने मूलस्थानी कुटी
करावी त्यानंतर युरिया ८० किलो + सुपर फॉस्फेट १०० किलो प्रति हेक्टर समप्रमाणात
मिसळून टाकावे व मशागत करून केलेली कुटी मातीआड करावी जेणेकरून येणाऱ्या खरीप
हंगामापर्यंत संपूर्ण कापूस कुटी कुजून जमिनीतील सेंद्रिय घटकामध्ये वाढ होईल.
तूर
काढणी अवस्था
काढणीस तयार असलेल्या तूर पीकाची कापणी करुन घ्यावी
व कापणी केलेले बंडल वाळविण्याकरीता शेतातच
तूर पीकाच्या झाडांच्या बुडांवर ठेवावे. योग्य वाळवणी झाल्यानंतर मळणी किंवा
संयुक्त पीक काढणी यंत्राव्दारे मळणी करुन धान्य वाळवून सुरक्षित ठिकाणी साठवणूक
करावी.
रब्बी ज्वारी
कणसे धरणे ते दाणे भरणे अवस्था
पक्ष्यांपासून ज्वारी पिकाच्या कणसांचे संरक्षण
करण्यासाठी (उदा. रिळ लावणे, आवाज करणारी पंख्यासारखी स्वयंचलित यंत्रे बसविणे,
बुजगावणे उभे करणे इत्यादी) उपाययोजना कराव्यात.
मका (रब्बी)
फुलोरा ते कणसे धरणे अवस्था
मागील आठवड्यातील तापमानातील चढउतारामुळे मका पिकावर लष्करी अळीचा प्रादूर्भाव दिसुन येत
असुन याच्या व्यवस्थापनासाठी थायमिथॉक्झाम १२.६ टक्के + लॅमडा सायहॅलोथ्रीन ९.५
टक्के झेडसी प्रति ५ मिली किंवा क्लोरॅनट्रानिलीप्रोल १८.५ एससी ४ मिली प्रति १०
लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ वातावरणात फवारणी करावी. तसेच पाण्याच्या
उपलब्धतेनुसार पिकास पाणी व्यवस्थापन करावे.
करडई
बोंडया धरणे
मागील आठवड्यातील तापमानातील चढउतारामुळे बऱ्याच ठिकाणी करडई
पिकावर अल्टरनेरीया (करपा) या रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत असून याच्या
व्यवस्थापनासाठी मॅन्कोझेब (७५ डब्लूपी) २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून
स्वच्छ वातावरणात फवारणी करावी.
गहू
फुटवे ते ओंबी धरणे अवस्था
मागील आठवड्यातील तापमानातील चढउतारामुळे गहू
पिकामध्ये पोंगे मर (खोड किड) दिसून येत असून याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट ३०
टक्के २० मिली किंवा क्लोरोपायरीफॉस २० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ
वातावरणात फवारणी करावी. तसेच तांबेरा रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास
याच्या व्यवस्थापनासाठी झायनेब किंवा मॅन्कोझेब ७५ डब्लूपी २५ ग्रॅम प्रति १०
लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ वातावरणात फवारणी करावी. गहू पिकास गरजेनुसार पाणी
व्यवस्थापन करावे.
कांदा
कंद वाढीची अवस्था
कांदा पीकास पुर्नलागवड करुन ६० दिवस झाल्यास
१३:००:४५ किंवा ००:००:५० विद्राव्य खत १००
ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच मागील
आठवड्यातील तापमानातील चढउतारामुळे कांदा पिकावरील फुलकिडीच्या
व्यवस्थापनासाठी लॅम्बडा सायहॅलोथ्रीन ५ टक्के ईसी १० मिली किंवा फिप्रोनील ५
टक्के एससी २० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
आंबा
मोहोर अवस्था
आंबा मोहोर फुलात असताना ते फळधारणा होईपर्यत कीटकनाशकांची फवारणी शक्यतो
टाळावी. फवारणी करणे गरजेचे असल्यास बागेमध्ये परागीभवन करणाऱ्या कीटकांवर होणार
परिणाम टाळण्याकरिता फवारणी शक्यतो सकाळी किंवा सायंकाळी करावी. तसेच आंबा
बागेमध्ये गरजेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.
भाजीपाला
फुलधारणा ते फळधारणा
भाजीपाला पिकामध्ये तण नियंत्रणाची कामे करून पाणी व्यवस्थापन करावे. तसेच
तापमानातील चढउतारामुळे मिरची पिकावरील भुरी रोगाच्या व्यवस्थापनासाठी कार्बेन्डाझीम ५०
टक्के डब्लूपी १० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
पशुसंवर्धन
कुक्कुटपालनामध्ये थंडीच्या दिवसात पक्षांना उबेची
आवश्यकता जास्त असते. म्हणून पिवळया बल्बची संख्या किंवा आवश्यकतेनुसार जमीनीपासून
उंची बदलवत रहावी तसेच शेडला गोणपाट/पोत्यांचे पडदे लावून थंडीपासून संरक्षण
करावे.
इतर
सध्यस्तिथीत
तापमानात घट होऊन थंडी वाढलेली आहे, तरी शेतकरी बांधवांनी पिके, भाजीपाला पिके व फळबागेस सायंकाळच्या वेळेस पाणी द्यावे. जेणेकरुन
पिकाच्या भोवताली तापमानात वाढ होवून पिकाचे थंडीपासुन संरक्षण होईल.
Comments
Post a Comment