औरंगाबाद जिल्ह्याकरिता दिनांक २३ ते २७ ऑगष्ट २०२३ साठी हवामान अंदाज व कृषि हवामानसल्ला

 प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार औरंगाबाद जिल्हयात पुढील पाच दिवसात आकाश ढगाळ राहून तुरळक ठिकाणी हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान २८.० ते ३०.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २०.० ते २१.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ७४ ते ८५ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग २० ते २२ किमी/तास राहण्याची शक्यता आहे.

सर्तकता : औरंगाबाद जिल्हयात दि. २२ ऑगष्ट २०२३ रोजी तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजेच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता असुन वा-याचा वेग जास्त (३० ते ४० किमी/तास) राहण्याची शक्यता आहे.

विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) औरंगाबाद जिल्हयात दि. २७ ऑगष्ट ते ०२ सप्टेंबर, २०२३ दरम्यान आकाश अंशतःढगाळ ते ढगाळ राहून पर्जन्यमान, कमाल तापमान व किमान तापमान सरासरी ऐवढे राहण्याची शक्यता आहे.

कृषी हवामान सल्ला

सोयाबीन

कळी ते फुलोर अवस्था

ढगाळ वातावरण व वाढलेली आर्द्रता यामुळे सोयाबीन पिकावर पाने खाणारी अळीचा प्रादूर्भाव ‍दिसुन येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी शेतात T आकाराचे पक्षीथांबे उभारावेत तसेच इमामेक्टिन बेन्झोएट १.९ टक्के ईसी ८.५ मिलि किंवा प्रोफेनोफॉस ५० ईसी २० मिली किंवा फ्ल्युबेन्डामाईड २० टक्के डब्ल्युजी ५-६ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ वातावरणात फवारणी करावी. तसेच सोयाबीन पिकावर चक्रीभुंगा किडीचा प्रादुर्भाव दिसत असुन याच्या व्यवस्थापनासाठी थायमिथोक्झाम १२.६ टक्के + लॅमडा सायहॅलोथ्रीन ९.५ टक्के झेडसी २.५ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळुन स्वच्छ वातावरणात फवारणी करावी. तसेच पीकास पाण्याचा ताण बसत असल्यास पोटॅशियम नायट्रेट(१३:००:४५) १०० ग्रॅम प्रति १० लीटर पाण्यात ‍मिसळून फवारणी करावी.

खरीप ज्वारी

वाढीची अवस्था

ढगाळ व दमट वातावरणामुळे ज्वारी पिकामध्ये लष्करी अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असुन, प्रादुर्भाव ओळखण्यासाठी पिकात १५ कामगंध सापळे प्रति एकर याप्रमाणे लावावेत. प्रादुर्भाव दिसून येत असल्यास व्यवस्थापनासाठी निंबोळी अर्क ५ टक्के किंवा अझाडिरॅक्टिन १५०० पीपीएम ५० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळुन स्वच्छ वातावरणात फवारणी करावी.

बाजरी

वाढीची अवस्था

दमट वातावरणामुळे बाजरी पिकामध्ये खोड किडीचा प्रादुर्भाव दिसुन येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी क्विनॉलफॉस २५ टक्के २० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळुन स्वच्छ वातावरणात फवारणी करावी.

खरीप भुईमूग 

फुल धारणा अवस्था

ढगाळ वातावरण व वाढलेल्या आर्द्रतेमुळे भुईमुग पिकामध्ये टिक्का रोगाचा प्रादुर्भाव दिसुन येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी हेक्साकोनाझोल ५ टक्के ईसी ३० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ वातावरणात फवारणी करावी. तसेच पिकास गरजेनुसार तुषार सिंचनाच्या सहाय्याने पाणी व्यवस्थापन करावे.

आद्रक

फुटवे  अवस्‍था

दमट वातावरणामुळे आद्रक पिकामध्ये कंदसड दिसुन येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी परभणी कृषि विद्यापीठाने विकसित केलेले बायोमिक्स हे जैविक बुरशीनाशक व कीडनाशकाची ५ लिटर प्रति एकर प्रमाण घेऊन पाण्यात मिसळुन आळवणी करावी. तसेच पिकास गरजेनुसार सिंचन करावे. 

हळद

फुटवे अवस्‍था

दमट वातावरणामुळे हळद पिकामध्ये कंदसड दिसुन येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी परभणी कृषि विद्यापीठाने विकसित केलेले बायोमिक्स हे जैविक बुरशीनाशक व कीडनाशकाची ५ लिटर प्रति एकर प्रमाण घेऊन पाण्यात मिसळुन आळवणी करावी. तसेच पिकास गरजेनुसार सिंचन करावे.  

मोसंबी

फळ वाढीची अवस्‍था

ढगाळ वातावरण व वाढलेल्या आर्द्रतेमुळे मोसंबी बागेमध्ये कोवळ्या पानावर मावा किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असून याच्या व्यवस्थापनासाठी डायमेथोएट ३० टक्के ईसी २० मिली किंवा फिप्रोनिल ५ टक्के एसएल २० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ वातावरणात फवारणी करावी. तसेच फळांची प्रत सुधारण्यासाठी जिब्रेलिक ऍसिड (GA) २ ग्रॅम + पोटॅशियम नायट्रेट १.५ किलो + बोरिक ऍसिड ३०० ग्रॅम प्रति १०० लिटर पाण्यात मिसळुन स्वच्छ वातावरणात फवारणी करावी. तसेच बागेत गरजेनुसार सिंचन करावे.

डाळिंब

फळ वाढ ते काढणी अवस्‍था

डाळिंब बागेमध्ये फायटोप्थोरा बुरशीमुळे मर दिसुन येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी मेटालॅक्झिल ८ टक्के + मॅन्कोझेब ६४ टक्के २० ते २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळुन आळवणी करावी.

भाजीपाला

फुल ते फळ धारणा अवस्था

ढगाळ वातावरण व वाढलेल्या आर्द्रतेमुळे टोमॅटो पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी कॉपर ऑक्झीक्लोराईड किंवा मॅन्कोझेब या बुरशीनाशकाची २० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.तसेच भाजीपाला पिकास गरजेनुसार सिंचन करावे. तसेच भाजीपाला पिकामध्ये रस शोषण करणाऱ्या किडींच्या व्यवस्थापनासाठी निळे व पिवळे चिकट सापळे प्रत्येकी २५ प्रति एकर याप्रमाणे लावावेत.  

तुती रेशीम

रेशीम किटकांच्या वाढीच्या अवस्थेनंतर चौथी कात अवस्थेपुर्वी ढगाळ हवामानात फांदी खादय देण्यापुर्वी रॅकवर १०० अंडी पुंजासाठी १० ते १५ किलो १०-१२ दिवसात पांढरा चूना व कात पास होण्यापुर्वी विजेता निर्जंतुक ४ किग्रॅ एक दिवस आड धूरळणी करावी.    

पशुसंवर्धन

पावसाळ्यामध्ये अस्वच्छता व वातावरणातील आर्द्रता अधिक असल्याने या वातावरणात विविध जिवाणू व विषाणूंची वाढ झपाट्याने होऊन जनावरे जिवाणुजन्य व विषाणुजन्य रोगास बळी पडतात हे टाळण्यासाठी जनावरांच्या गोठयात व गोठ्याच्या बाहेरील भागात निर्जंतुकीकरण करून घ्यावे.

इतर

सद्यस्थितीत जिल्हयात ब-याच ठिकाणी कमी पाऊस झाल्यामुळे पीकास पाण्याचा ताण बसत असुन त्याकरीता पोटॅशियम नायट्रेट(१३:००:४५) १०० ग्रॅम प्रति १० लीटर पाण्यात ‍मिसळून फवारणी करावी.

सदर कृषि सल्ला पत्रिका जिल्हा कृषि हवामान केंद्र (DAMU) कृषि विज्ञान केंद्र, औरंगाबाद-१ येथील तज्ञ समितीच्या शिफारशीवरून तयार करून प्रसारित करण्यात आलेली आहे.

Comments

Popular posts from this blog

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ०२ ते ०६ एप्रिल २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याकरिता दिनांक १९ ते २३ ऑक्टोंबर २०२४ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक १५ ते १९ जानेवारी २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला