छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याकरिता दिनांक ३१ जानेवारी ते ०४ फेब्रुवारी २०२४ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात हवामान कोरडे व आकाश स्वच्छ ते अंशतःढगाळ राहून दि. ०१ व ०२ फेब्रुवारी २०२४ रोजी किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान २९.० ते ३१.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान ०९.० ते १३.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता १९ ते ५४ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग ०८ ते १२ किमी/तास राहण्याची शक्यता आहे.
विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती
संभाजीनगर जिल्हयात दि. ०४ ते १० फेब्रुवारी २०२४ दरम्यान हवामान कोरडे राहून आकाश
स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. तसेच पर्जन्यमान सरासरीपेक्षा कमी तर कमाल तापमान व
किमान तापमान सरासरी ऐवढे राहण्याची शक्यता आहे.
कृषी हवामान सल्ला
आद्रक
काढणी अवस्था
आद्रक
पिकाची काढणी करत असताना ७० ते ८० टक्क्यांपेक्षा जास्त पाने सुकल्यानंतर पाला
कापून काढावा. त्यासाठी पेट्रोलचलित ब्रश कटरचा वापर करावा. अन्यथा तो गोळा करावा.
पाला कापल्यानंतर हलकेसे पाणी देऊन आद्रक पिकाची काढणी करावी. गादीवाफ्यावर लागवड
असल्यास ट्रॅक्टरचलित यंत्राद्वारे आद्रक पिकाची काढणी करता येते. यामुळे इंधन, वेळ आणि मजूर यांची बचत होते. काढणी केल्यानंतर
त्यास चिकटलेली माती स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावी आणि योग्य ठिकाणी साठवणूक करावी.
हळद
काढणी अवस्था
हळद पिकाची
काढणी जमिनीत योग्य ओलावा बघून करावी. कंद काढणीपूर्वी राहिलेली पाने जमिनीलगत
कापून घ्यावीत. जर हळद पिकाची लागवड सरीवरंबा पद्धतीने केली असल्यास काढणी
कुदळीच्या सहाय्याने करावी व लागवड गादीवाफ्यावर केली असल्यास काढणी यंत्राच्या
सहाय्याने करावी. काढणी करत असताना गडडयांना
इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. काढणी करताना जेठे गड्डे व हळकुंडे वेगळी
करावीत व काढणीनंतर योग्य ठिकाणी साठवणूक करावी.
हरभरा
घाटे
धरणे ते दाणे भरणे अवस्था
मागील
आठवड्यातील तापमानातील चढउतारामुळे हरभरा पिकामध्ये घाटे अळीचा प्रादूर्भाव दिसून
येत असून याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट ५ एसजी ४ ग्रॅम किंवा
क्लोरेंट्रेनिलीप्रोल १८.५ टक्के ३ मिलि प्रति १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी
करावी. पावर पंपाने फवारणी करायची असल्यास कीटकनाशकांचे प्रमाण तिप्पट करावे.
आवश्यकता भासल्यास दुसरी फवारणी १५ दिवसांच्या अंतराने करावी.
जवस
बोंड धरणे ते दाणे भरणे अवस्था
जवस
पीकावरील गादमाशी अथवा पिलीचा प्रादूर्भाव ओळखण्यासाठी निरिक्षण करावे.
प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी डायमेथोएट ३० टक्के १० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी
करावी.
बटाटा
कंद
लागणे ते कंद वाढीची अवस्था
बटाटा पिकातील
तणनियंत्रण करुन वरंब्यास मातीची भर दयावी तसेच पिकास गरजेनुसार पाणी व्यवस्थापन
करावे. तसेच
मागील
आठवड्यातील तापमानातील चढउतारामुळे बटाटा पिकावर रसशोषण करणार्या किडींच्या
व्यवस्थापनासाठी डायमिथोएट (३० टक्के) १५ मिली किंवा अॅसिटामीप्रीड २-३ ग्रॅम
प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच पिवळ्या व निळया
रंगाचे चिकट सापळे (छोट्या आकाराची) प्रत्येक ४-५ ओळींनंतर एकरी २५ ते ३० या
प्रमाणात लावावेत.
मोसंबी
फुलधारणा अवस्था
मोसंबी
बागेला पाणी व्यवस्थापन करताना झाडाच्या खोडाला पाणी लागणार नाही याची काळजी घ्यावी.तसेच मागील आठवड्यातील ढगाळ
हवामान मोसंबी बागेमध्ये कोवळ्या पानावर मावा किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे
याच्या व्यवस्थापनासाठी डायमेथोएट ३० टक्के ईसी २० मिली किंवा फिप्रोनिल ५ टक्के एसएल
२० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
डाळिंब
फुलोरा अवस्था
मागील
आठवड्यातील ढगाळ हवामान व तापमानातील चढउतारामुळे डाळिंब बागेत फुलगळ होत आहे
याच्या व्यवस्थापनासाठी नॅप्थॅलीक ऍसिटिक ऍसिड (एनएए) २ ते ३ मिली आणि ००:५२:३४ विद्राव्य
खते ५० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यातून मिसळून फवारावे.
डाळिंब
बागेतील फुलकिडीच्या व्यवस्थापनासाठी डायमेथोएट ३० ईसी १० मिली प्रति १० लिटर
पाण्यात मिसळून फवारणी करावी.
भाजीपाला
फुलधारणा ते फळधारणा अवस्था
भाजीपाला
पिकामध्ये तणनियंत्रणाची कामे करून पिकास पाणी द्यावे व काढणीस तयार असलेल्या
भाजीपाला पिकाची काढणी करून घ्यावी. मागील आठवड्यामध्ये किमान
तापमानात झालेल्या घटीमुळे भाजीपाला पिकामध्ये रस शोषण करणाऱ्या किडींचा
प्रादुर्भाव दिसून येत असून याच्या व्यवस्थापनासाठी पिकात निळ्या व पिवळ्या रंगाची
चिकट सापळे (छोट्या आकाराची) एकरी २५ ते ३० या प्रमाणात लावावेत.तसेच निंबोळी
अर्काची फवारणी करावी.
तुती रेशीम
वाढीची अवस्था
तुती पाने
उत्पादन वाढीसाठी व प्रकाशाचा पुरेपुर वापर होण्यासाठी विपुल (गोदरेज) २० मिली
प्रति १० लिटर पाण्यात मिसळून छाटणीनंतर १२ ते १५ दिवसांनी तुती बागेवर फवारणी
करावी त्यामूळे पानांचे २० टक्के उत्पादन
वाढ मिळते. पानावर ठिपके किंवा करपा रोग किंवा भुरी रोग प्रादूर्भाव असेल तर सोबत
बाव्हीस्टीन बुरशीनाशक (कार्बेन्डाझीम) २० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून
फवारणी करावी. दुस-या वर्षापासुन व्हि -१ जातीचे एकरी २५ टन पानाचे उत्पादन
मिळते.
पशुसंवर्धन
सद्यस्थितीत
तापमानातील अचानक होणा-या चढउतारामुळे गाय, म्हैस, शेळी व कोंबडी यांसारख्या
जनावरे व पक्ष्यांमध्ये विविध आजारांमुळे मरतूक होण्याची शक्यता वाढते. याकरीता
प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जनावरांना व पक्ष्यांना वेळेवर लसीकरण करणे महत्वाचे
असते. त्यामुळे शेतक-यांनी आजाराप्रती जनावरे व पक्ष्यांमधील
रोगप्रतिकारशक्ती वाढून बचाव होण्याकरीता प्रशिक्षित व्यक्तीकडून किंवा त्यांच्या
मार्गदर्शनाखाली नियमित लसीकरण करुन घ्यावे.
इतर
शेतक-यांनी कापुस व तुर पिकांच्या
काढणीनंतर रान तयार करुन पाण्याच्या उपलब्धतेनुसार उन्हाळी भाजीपाला पिकांची लागवड
करावी.
Comments
Post a Comment