छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याकरिता दिनांक २८ सप्टेंबर ते ०२ ऑक्टोंबर २०२४ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात हवामान ढगाळ राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान ३०.० ते ३२.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २२.० ते २३.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ८० ते ९४ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग १० ते १५ किमी/तास राहण्याची शक्यता आहे.
सतर्कता: छत्रपती संभाजीनगर
जिल्हयात २७ सप्टेंबर २०२४ रोजी तुरळक ठिकाणी वादळीवारा व विजेच्या कडकडाटासह हलक्या
ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता असुन वा-याचा वेग जास्त (३० ते ४० किमी/तास)
राहण्याची शक्यता आहे.
विस्तारित
अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दिनांक ०२ ते ०८ ऑक्टोंबर २०२४
दरम्यान हवामान अंशतःढगाळ
ते ढगाळ राहील. तसेच पर्जन्यमान सरासरीपेक्षा ऐवढे तर कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी
किमान तापमान सरासरी ऐवढे राहण्याची शक्यता आहे.
कृषि
हवामान सल्ला
ऊस
वाढीची ते कांडे धरणे अवस्था
मागील आठवड्यातील दमट वातावरणामुळे ऊस
पिकामध्ये पिठ्या ढेकूण किडीचा प्रादुर्भाव दिसुन येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी
मोनोक्रोटोफॉस ३६ एस एल १० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ वातावरणात
फवारणी करावी.
कापूस
पाते लागणे ते बोंड धरणे
मागील आठवड्यातील ढगाळ व दमट वातावरणामुळे
कापुस पिकामध्ये पातेगळ दिसुन येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी नॅप्थॅलिक ॲसिटीक ॲसिड (एनएए)
२ ते २.५ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळुन स्वच्छ वातावरणात फवारणी करावी. तसेच
कापुस पीकावरील गुलाबी/शेंदरी बोंडअळीच्या
प्रादूर्भावावर लक्ष ठेवावे. त्यासाठी प्रति हेक्टरी ५ कामगंध सापळे लावावेत.
कापुस पिकातील डोमकळया दिसल्यास वेचून नष्ट कराव्यात. तसेच कापुस पीकामधील
तणव्यवस्थापनाची कामे करुन घ्यावीत. कापुस पीकातील साचलेल्या पाण्याचा निचरा करावा
तसेच पीकामध्ये पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी.
मका
कणसे धरणे
मागील आठवड्यातील ढगाळ व दमट वातावरणामुळे मका
पिकामध्ये लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असून सध्यस्थितीत मका पिकाची वाढ
झालेली असल्यामुळे व्यवस्थापनासाठी रासायनिक फवारणी करण्याऐवजी जैविक पध्दतीने किडव्यवस्थापन
करण्याकरीता मेटारायझियम ऍनिसोपली ५० ग्रॅम किंवा नोमुरीया रिलाई ५० ग्रॅम प्रति
१० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ वातावरणात फवारणी करावी. मका पीकातील साचलेल्या पाण्याचा निचरा करावा तसेच पीकामध्ये पाणी
साचणार नाही याची दक्षता घ्यावी.
तूर
फांद्या लागणे अवस्था
मागील आठवडयामधील ढगाळ
वातावरण व वाढलेली आर्द्रता यामुळे तूर पीकामध्ये पाने खाणा-या अळीचा प्रादूर्भाव
दिसून येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी प्रोफेनोफॉस ५० टक्के ईसी २० मीली किंवा
फ्लुबेंडामाईड ३९.३५ टक्के एससी २.५ मीली किंवा क्लोरॅन्ट्रानिलीप्रोल १८.५ एससी ३
मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ वातावरणात फवारणी करावी. तुर पीकातील साचलेल्या
पाण्याचा निचरा करावा तसेच पीकामध्ये पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी.
रब्बी ज्वारी
जमिनीची निवड
रब्बी ज्वारी पेरणीसाठी
मध्यम ते भारी, पाण्याचा योग्य निचरा होणारी व पाणी साठवून ठेवणारी जमीन
निवडावी. जमिनीचा सामू सर्वसाधारण ५.५ ते ८.५ असावा.
करडई
जमिनीची निवड
करडई पिकाच्या लागवडीसाठी
मध्यम ते भारी, खोल जमीन निवडावी. ४५
सें. मी. पेक्षा जास्त खोल जमिनीत करडईचे पीक चांगले येते. त्याचप्रमाणे जमीन
पाण्याचा निचरा होणारी आणि ओलावा टिकवून ठेवणारी असावी. सर्वसाधारण जमीनच सामू ६
ते ८ असावा. थोड़याफार चोपण जमिनीतही हे पीक येऊ शकते.
कांदा
रोपवाटीका तयार करणे
कांदयाची रोपे तयार
करण्यासाठी गादी वाफे १ मी रुंद, ३ मी लांब आणि १५ सेमी
उंच तयार करावा. वाफयाच्या रुंदीशी समांतर अशा ५ सेमी बोटाने रेषा पाडाव्यात आणि
यामध्ये बियाणे ओळीत पातळ पेरुन नंतर मातीने झाकुन टाकावे. कांदा लागवडीसाठी ॲग्रीफाउंड डार्क
रेड, ॲग्रीफाउंड लाईट रेड,भिमा
रेड, भिमा किरण (लाल कांदा) आणि भिमा स्वेत, भिमा सफेद (पांढरा कांदा) या वाणांचा
वापर करावा.
सिताफळ
फळ वाढीची ते परिपक्वता अवस्था
काढणीस तयार असलेल्या
सिताफळांची काढणी करुन घ्यावी. मागील आठवडयामधील पाऊस व वाढलेली आर्द्रता यामुळे सिताफळ
बागेत फळसड दिसुन येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी मॅन्कोझेब २० ग्रॅम +
कार्बेन्डाझिम १० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळुन स्वच्छ वातावरणात फवारणी
करावी. तसेच सिताफळ बागेतील तणव्यवस्थापनाची कामे करुन घ्यावीत.
भाजीपाला
फुलधारणा ते फळधारणा
मागील आठवड्यातील ढगाळ
वातावरणामुळे मिरची पिकावरील रस शोषण करणा-या (फुलकीडे,मावा) किडीच्या
व्यवस्थापनासाठी फिप्रोनिल ५ टक्के एससी २० मिली
प्रति १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ वातावरणात फवारणी करावी.
पशुसंवर्धन
सध्यस्थितीत शेळ्यांमध्ये
जुलाब/हगवण लागल्याचे दिसत असुन याच्या व्यवस्थापनासाठी २ चमचे ग्लुकोज, २ चमचे मीठ, २ चमचे खाण्याचा सोडा, २ चमचे लिंबाचा रस २ लिटर
पाण्यामध्ये मिसळून द्रावण तयार करून आजारी शेळ्यांना पाजावे.
इतर
मागील दोन दिवस जिल्ह्यामध्ये
झालेल्या पावसामुळे शेतकरी बांधवानी पीकातील तसेच फळबागेतील साचलेल्या पाण्याचा निचरा
करावा तसेच पीकामध्ये पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी.
Comments
Post a Comment