छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक १८ ते २२ डिसेंबर २०२४ साठी हवामान अंदाज व कृषीहवामान सल्ला
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात हवामान स्वच्छ ते अंशत:ढगाळ राहील. तसेच कमाल तापमान २९.० ते ३०.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान १०.० ते १५.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता २५ ते ५५ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग १ ते ४ किमी/तास राहण्याची शक्यता आहे.
विस्तारित अंदाजानुसार
(ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दिनांक
२२ ते २८ डिसेंबर २०२४ दरम्यान आकाश स्वच्छ राहील. तसेच पर्जन्यमान तसेच कमाल तापमान व किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता
आहे.
कृषी हवामान सल्ला
आद्रक
कंद वाढीची अवस्था
सद्यस्थित आद्रक पिकातील कंदवाढ होण्यासाठी व जमीनीचे तापमान योग्य
राखण्यासाठी पीकास संध्याकाळच्या वेळेस पाणी व्यवस्थापन करावे.
हळद
कंद वाढीची अवस्था
सद्यस्थित हळद पिकातील कंदवाढ होण्यासाठी व जमीनीचे तापमान योग्य
राखण्यासाठी पीकास संध्याकाळच्या वेळेस पाणी व्यवस्थापन करावे.
हरभरा
फांद्या लागणे ते फुलधारणा अवस्था
हरभरा पीकामध्ये घाटेअळीच्या सर्वेक्षणासाठी ५ कामगंध सापळे प्रति हेक्टरी
जमिनीपासून एक मीटर उंचीवर लावावेत व पीक एक महिन्याचे झाल्यावर पिकापेक्षा एक ते
दिड फूट उंचीचे T अक्षराच्या आकाराचे ५०
पक्षी थांबे प्रति हेक्टरी लावावेत. तसेच प्रादूर्भाव दिसून येत असल्यास
इमामेक्टीन बेन्झोएट ५ एसजी ४ ग्रॅम प्रति १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पावर पंपाने फवारणी करायची असल्यास
कीटकनाशकांचे प्रमाण तिप्पट करावे.
जवस
फुलोरा अवस्था
जवस पीकावरील गादमाशी अथवा पिलीचा प्रादूर्भाव ओळखण्यासाठी निरिक्षण
करावे. प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी डायमेथोएट ३० टक्के
१० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून
फवारणी करावी.
बटाटा
वाढीची अवस्था
मागील आठवड्यातील ढगाळ व दमट वातावरणामुळे बटाटा पिकामध्ये लवकर येणारा
करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असुन, याच्या व्यवस्थापनासाठी मॅन्कोझेब ७५
टक्के डब्ल्यूपी २५ ते ३० ग्रॅम किंवा कॉपर ऑक्झीक्लोराईड ३० ग्रॅम किंवा
प्रोपीनेब ७० टक्के डब्ल्यूपी ३० ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी
करावी.
मोसंबी
आंबिया बहार व्यवस्थापन
मोसंबी बागेतील ४० टक्के पानगळ होणे, पाने गोलाकार होणे ही व्यवस्थित ताण
बसण्याची लक्षणे असुन, ताण तोडतांना शेतक-यानी झाडांच्या वयानुसार हळूहळू बागेस
पाणी देण्यास सुरवात करावी व १ ग्रॅम जिब्रॅलीक आम्ल + १ किलो युरिया प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी यामुळे बहार चांगला येण्यास मदत होते. ताण तोडतांना हलक्या ओलिता अगोदर बागेस शिफारशीत खत मात्रा द्यावी. (५ ते ७ वर्षे वयोगटातील झाडांना
३५० ग्रॅम नत्र, १५० ग्रॅम स्फुरद, १५० ग्रॅम पालाश, ८ ते १० वयोगटातील झाडांना
४०० ग्रॅम नत्र, २०० गॅम स्फुरद, २०० ग्रॅम पालाश तर १० ते पुढील वयोगटातील
झाडांना ५०० ग्रॅम नत्र, २५० स्फुरद, २५० पालाश याप्रमाणे खतमात्रा दयावी)
डाळिंब
बहार व्यवस्थापन
डाळिंब बागेस योग्य ताण बसल्यास ताण तोडताना शिफारशीत ३०० ग्रॅम नत्र, २५० ग्रॅम स्फुरद, २५०
ग्रॅम पालाश प्रती झाड खत मात्रा देऊन बागेस हलके पाणी दयावे.
भाजीपाला
फळ धारणा ते
फळवाढीची अवस्था
सद्यस्थितीत मिरची पिकावरील रस शोषण करणा-या (फुलकीडे, मावा ) किडीच्या व्यवस्थापनासाठी फिप्रोनिल ५ टक्के एससी २० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
तुती रेशीम
सद्यस्थितीमध्ये थंडीत वाढ होत
असुन रेशीम कीटक संगोपनगृहातील तापमान २० अंशच्या खाली असेल तर कीटक तुती पाने खात
नाहीत तसेच २५ ते २८ अंश सें. मर्यादित ठेवण्यासाठी संगोपनगृहात कोळसा शेगडी किंवा
इलेकट्रीक रूम हिटरचा वापर करावा.तापमान मर्यादित असल्यास रेशीम कीटक तुती पाने
खातात व त्यांची चांगली वाढ होते.
पशुसंवर्धन
सद्यस्थितीत थंडीमुळे
जनावरांचे स्नायू आखडतात व त्वचा रखरखीत होते. त्यामुळे अशा परिस्थितीत जनावरांना
अतिरिक्त उर्जेची गरज असते. अशावेळी जास्त उर्जा देणा-या खाद्याचा जसे की भरडा,
पेंड यांसारख्या स्निग्ध पदार्थांचा वापर करावा, जेणेकरुन जनावरांमधील जास्तीच्या
उर्जेची गरज पूर्ण होवून अपचन टाळता येईल.
इतर
सद्यस्थित तापमानात घट झालेली असून अशावेळी शेतकरी बांधवांनी पीकाची वाढ
व्यवस्थित होण्यासाठी व जमीनीचे तापमान योग्य राखण्यासाठी पीकास मुख्यत: संध्याकाळच्या
वेळेस पाणी व्यवस्थापन करावे.
Comments
Post a Comment