छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याकरिता दिनांक १९ ते २३ जुन २०२४ साठी हवामान अंदाज व कृषि हवामान सल्ला
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात हवामान अंशत:ढगाळ राहून तुरळक ठिकाणी अतीशय हलक्या ते हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान ३५.० ते ३७.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २३.० ते २४.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ५० ते ७२ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग २२ ते २५ किमी/तास राहण्याची शक्यता आहे.
विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती
संभाजीनगर जिल्हयात दि. २३ ते २९ जून २०२४ दरम्यान आकाश अंशत:ढगाळ ते ढगाळ
राहण्याची शक्यता आहे. तसेच पर्जन्यमान सरासरीपेक्षा कमी तसेच कमाल तापमान व किमान
तापमान सरासरी ऐवढे राहण्याची शक्यता आहे.
कृषी हवामान सल्ला
सोयाबीन
पेरणीतील
अंतर, बियाण्याचे प्रमाण व बीजप्रक्रिया
सोयाबीन
पिकाच्या पेरणीसाठी ६५ किलो प्रती हेक्टर बियाणे वापरावे व पेरणीतील अंतर ४५ X ५ सें.मी. ठेवावे.
पेरणीपुर्वी बियाण्यास २-३ ग्रॅम बावीस्टीन + ३-४ ग्रॅम थायरम व त्यानंतर ०५ मिलि प्रति किलो याप्रमाणे ब्रॅडीराझोबियम आणि पीएसबी या जिवाणू संवर्धकाची
बिजप्रक्रीया करावी. त्यानंतर बियाणे सावलीमध्ये वाळवून पेरणीयोग्य ओलावा असतांना
पेरणी करावी. तसेच सोयाबीन पिकाची जोमदार वाढ होण्यासाठी पेरणीच्या वेळी हेक्टरी
३० किलो नत्र ६० किलो स्फुरद व ३० किलो
पालाश दयावे. तसेच सोयाबीन पिकामध्ये तणनाशक पेंडीमिथॅलीन ०.७५ किलो क्रियाशील घटक
प्रति हेक्टर ७५० ते १००० लिटर पाण्यात मिसळून पेरणीपूर्वी फवारावे.
खरीप ज्वारी
पेरणीतील
अंतर, बियाण्याचे प्रमाण व बीजप्रक्रिया
ज्वारी
पिकाच्या पेरणीसाठी ७.५ किल्लो संकरित व १० किल्लो सुधारित प्रती हेक्टर बियाणे
वापरावे व पेरणीतील अंतर ४५ x
१२.५
से.मी. ठेवावे. पेरणीपूर्वी ३०० मेस सल्फर २.५ ग्रॅम आणि इमेडाक्लोप्राइड ४ मिलि प्रती
किलो बियाणे याप्रमाणात बीज प्रक्रिया करावी तसेच अझॅटोबॅक्टर + पीएसबी ५ मिलि
प्रती किलो प्रमाणात बिजप्रक्रीया करूनच जमीनीमध्ये पेरणीयोग्य ओलावा असताना पेरणी
करावी. तसेच खरीप ज्वारीस ४० किलो नत्र, ४०
किलो स्फुरद आणि ४० किलो पालाश प्रती हेक्टरी पेरणी करताना दयावे.
बाजरी
पेरणीतील
अंतर, बियाण्याचे प्रमाण व बीजप्रक्रिया
बाजरी
पिकाच्या पेरणीसाठी ३ किलो प्रती हेक्टर बियाणे वापरावे व पेरणीतील अंतर ४५ x १० से.मी. ठेवावे.
पेरणीपूर्वी ६ ग्रॅम मेटॅलॅक्झील प्रती किलो व त्यानंतर अझोस्पिरिलम व स्फुरद
विरघळणारे जिवाणू संवर्धनाची १० मिली प्रती किलो बिजप्रक्रिया करावी. त्यानंतर
बियाणे सावलीमध्ये वाळवून जमीनीमध्ये पेरणीयोग्य ओलावा असतांना पेरणी करावी. तसेच
पिकास हलक्या जमिनीत ४०:२०:२० व मध्यम ते भारी जमिनीत ६०:३०:३० पैकी अर्धे नत्र, संपूर्ण स्फुरद व संपूर्ण पालाश पेरणी
करताना दयावे.
खरीप भुईमूग
पेरणीतील
अंतर, बियाण्याचे प्रमाण व बीजप्रक्रिया
भुईमूग
पिकाच्या पेरणीसाठी १०० ते १२० किलो (उपट्या) तर ८० ते १०० किलो (पसऱ्या) प्रती
हेक्टर बियाणे वापरावे व पेरणीतील अंतर ३०
x १० से.मी
व ४५ x १५ से. मी. ठेवावे. पेरणीपूर्वी २५० ग्रॅम रायझोबियम
व पीएसबी ची प्रती १० किलो बियाण्यास बिजप्रक्रिया करूनच जमिनीत पेरणीयोग्य ओलावा
असतांना पेरणी करावी. तसेच भुईमूग पिकास
२०:५०:०० नत्र : स्फुरद : पालाश संपूर्ण खतमात्रा पेरणी करताना दयावे.
आद्रक
लागवडपुर्व नियोजन
मध्यम व
भारी जमिनीमध्ये आद्रक पीकाची लागवड सरी वरंबा पध्दतीने करावी. यासाठी लाकडी
नांगराच्या सहाय्याने ४५ सें.मी. वरती स-या पाडुन घ्याव्यात. तसेच सरी
पाडण्यापुर्वी शिफारशीत स्फुरद व पालाश जमिनीत मिसळावे.
हळद
लागवडपुर्व नियोजन
हळद
लागवडीकरीता ७५ ते ९० से.मी. अंतरावर सरी पाडून घ्याव्यात. सरी पाडण्यापुर्वी
शिफारशीत स्फुदर व पालाश जमिनीत मिसळावे. तसेच जमीनीच्या उताराप्रमाणे ६ ते ७ सरी
वरंब्याचा एक याप्रमाणे वाफे तयार करावेत.
मोसंबी
वाढीची अवस्था
मोसंबी
फळबागेत ५००: ५००: ५०० ग्रॅम नत्र : स्फुरद : पालाश रासायनिक खतमात्रा + ४० किलो
शेणखत प्रती झाड द्यावी.
डाळिंब
वाढीची अवस्था
डाळिंब
फळबागेत ३००: २५०: २५० ग्रॅम नत्र : स्फुरद
: पालाश रासायनिक खतमात्रा + ४० किलो शेणखत प्रती झाड द्यावा.
भाजीपाला
रोपे तयार करणे
खरीप हंगातात भाजीपाला लागवडीसाठी रोपवाटीकेत गादी वाफयावर बियाण्याची
लागवड करून रोपे तयार करावीत. तसेच
काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची काढणी सकाळी व सायंकाळच्या वेळेस
करावी.
तुती रेशीम
लागवड पुर्व तयारी
उन्हाळ्यात
शक्यतो पट्टा पद्धत तुती लागवडीत शेंद्रीय पदार्थाचे किंवा पॉलिथिन आच्छादनाचा
वापर करावा. शेंद्रीय आच्छादनात गवत, काडीकचरा पिकांचे अवशेष, झाडांची
पाने, उसाची पाचट इत्यादी किंवा साखर कारखान्यातील
मळी याचा वापर करावा. पट्टा पद्धत तुती लागवडीत एकास आड एक पट्यात २ x २.५ x १.५ फूट
आकाराची चर करून त्यात वरील शेंद्रीय पदार्थ भरावेत.
पशुसंवर्धन
पशुपालकांनी
आपल्या जनावरांच्या असणारे बाह्य परजीवींचे (गोचीड, डास, गोमाशी इत्यादी) नियंत्रण
करावे. तसेच जनावरांना लसीकरणापूर्वी जीवनसत्वे आणि खनिज मिश्रणाचा पुरवठा करावा.
इतर
सोयाबीन पीकांची पेरणी करतांना शेतक-यांनी रुंद सरी वाफा वरंबा (बीबीएफ) यंत्राचा वापर करावा.जेणेकरुन वाफयामधील साचलेले अतिरिक्त
पावसाचे पाणी वाहून जाते तर कमी पाऊस झाल्यास मुलस्थानी जलसंधारण होऊन ओलावा टिकुन
राहून अधिक उत्पन्न मिळते.
Comments
Post a Comment