छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याकरिता दिनांक ३० नोव्हेंबर ते ०४ डिसेंबर २०२४ साठी हवामान अंदाज व कृषीहवामान सल्ला
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात हवामान अंशत:ढगाळ ते ढगाळ राहील. तसेच कमाल तापमान २९.० ते ३१.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान ११.० ते १५.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ३८ ते ६६ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग ०७ ते ०८ किमी/तास राहण्याची शक्यता आहे.
विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती
संभाजीनगर जिल्हयात दि. ०४ ते १० डिसेंबर २०२४ दरम्यान आकाश स्वच्छ राहील. तसेच
पर्जन्यमान सरासरीपेक्षा जास्त तर कमाल
तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरी ऐवढे राहण्याची शक्यता आहे.
कृषि
हवामान सल्ला
ऊस
फुटवे अवस्था ते कांडे धरणे
तापमानातील
चढउतारामुळे ऊस पिकामध्ये खोडकिडीचा प्रादुर्भाव दिसुन येत असुन, याच्या
व्यवस्थापनासाठी क्लोरोपायरीफॉस २० ईसी २० ते २५
मिली किंवा फिप्रोनील ५ एससी ३० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी
करावी. तसेच लागवड करून सहा आठवडे झाले असल्यास ऊस पिकामध्ये
नत्र खताची दुसरी मात्रा १२० किलो प्रति हेक्टर प्रमाणात द्यावी.
कापूस
बोंड धरणे ते
वेचणी
कापुस
पीकातील गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी हेक्टरी ५ याप्रमाणात गुलाबी
बोंडअळीचे कामगंध सापळे लावावेत. कापूस पीकातील डोमकळ्या वेचून नष्ट कराव्यात. प्रादूर्भाव
जास्त प्रमाणास दिसून येत असल्यास प्रोफेनोफॉस ५० ईसी ३० मिली किंवा प्रोफेनोफॉस
४० टक्के + सायपरमेथ्रीन ४ टक्के ईसी १० मिली किंवा लॅमडा सायहॅलोथ्रीन ५ ईसी ६
मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळुन आलटून पालटून फवारणी करावी. वेचणीस तयार
असलेल्या कापूस पिकाची वेचणी करून घ्यावी. पहिल्या आणि दुसऱ्या वेचणीचा चांगला व
कवडी कापूस वेगळा साठवावा.
तूर
शेंगा धरणे अवस्था
तूर
पिकामध्ये शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या प्रादुर्भाव दिसून येत असल्यास इमामेक्टीन
बेन्झोएट (५ एसजी) ४.४ ग्रॅम किंवा इंडोक्झाकार्ब (१५.८ इसी) ६.६ मिली प्रती १०
लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच तूर पिकावरील शेंगमाशीच्या
व्यवस्थापनासाठी लॅमडा सायहॅलोथ्रीन ५ ईसी ०८ मिली किंवा ल्युफेनुरॉन ५.४ टक्के १२
मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
रब्बी ज्वारी
वाढीची अवस्था
तापमानातील
चढउतारामुळे ज्वारी पिकामध्ये लष्करी अळीच्या
सर्वेक्षणासाठी एकरी ०५ कामगंध सापळे लावावेत.तसेच प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ५
टक्के निंबोळी अर्क किंवा अझाडीरॅक्टीन १५०० पीपीएम ५० मिली प्रति १० लिटर पाण्यात
मिसळून फवारणी करावी.
मका (रब्बी)
वाढीची अवस्था
मका
पिकामध्ये तण व्यवस्थापन व अंतरमशागतीचे कामे करावीत. मका पिकावरील लष्करी
अळीच्या सर्वेक्षणासाठी एकरी ०५ कामगंध सापळे लावावेत.तसेच प्रतिबंधात्मक उपाय
म्हणून ५ टक्के निंबोळी अर्क किंवा अझाडीरॅक्टीन १५०० पीपीएम ५० मिली प्रति १०
लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
करडई
वाढीची अवस्था
तापमानातील
चढउतारामुळे करडई पिकातील रस शोषण
करणा-या (काळा मावा) किडीच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट ३० ईसी १० मिली प्रति १०
लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
गहू
वाढीची अवस्था
गहू पिकाची
पेरणी १५ डिसेंबर पर्यंत करता येते. पेरणी झाली नसल्यास लवकरात लवकर गहू पिकाची
पेरणी बीजप्रक्रिया करूनच करावी. तसेच पेरणी करुन २० ते ३० दिवस झालेल्या फुटवे
अवस्थेतील गहू पीकास नत्राचा दुसरा हप्ता ५० किलो याप्रमाणे प्रतिहेक्टरी दयावा.
कांदा
वाढीची अवस्था
सध्यस्थितीमध्ये
तापमानातील चढउतारामुळे कांदा पिकामध्ये करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असुन
याच्या व्यवस्थापनासाठी मॅन्कोझेब २५ ग्रॅम किंवा डायथेन एम-४५ २५ ग्रॅम प्रति १०
लिटर पाण्यात मिसळून १० ते १५ दिवसाच्या अंतराने आलटून पालटून फवारणी करावी
पेरू
फळ वाढीची अवस्था
सद्यस्थितीत
पेरू बागेमध्ये फळमाशीचा प्रादुर्भाव दिसून येत असून याच्या व्यवस्थापनासाठी
हेक्टरी २० ते २५ मिथाईल युजेनॉलची रक्षक सापळे लावावीत. तसेच काढणीस तयार
असलेल्या पेरु फळांची काढणी करून प्रतवारी करावी व बाजारपेठेत विक्रीसाठी
पाठवावीत.
आंबा
बहार धरणे
आंबा बागेत
फुलधारणा व्यवस्थित होण्यासाठी १३:००:४५ विद्राव्य खताची १५० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
भाजीपाला
फुलधारणा ते फळधारणा
तापमानातील
चढउतारामुळे टोमॅटो व वांगी पिकामध्ये शेंडा व फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव
दिसून येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरानट्रानिलीप्रोल १८.५ एससी ४ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून
स्वच्छ वातावरणात फवारणी करावी.
पशुसंवर्धन
सध्यस्थितीत
थंडी वाढण्यास सुरवात झाली असुन थंडीपासुन बचाव करण्यासाठी जनावरे, शेळ्या तसेच
कोंबडयाच्या गोठा/शेडला बारदाण्याचे पडदे लावावेत. तसेच शेडमधील तापमान उष्ण
ठेवण्यासाठी शेडमध्ये रात्री १२ ते सकाळी ७ पर्यंत विदयुत बल्ब लावावेत. तसेच
जनावरांना रात्रीच्या वेळेस उघडयावर न बांधता गोठयातच बांधावे. शेतकरी बांधवांनी
शेळया व मेंढयांना सकाळी उशीरा चरण्यासाठी सोडावे व सर्दी जाणवल्यास
पशुवैदयकांच्या सल्ल्याने उपचार करावा.
Comments
Post a Comment