छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ०५ ते ०९ एप्रिल २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात हवामान स्वच्छ ते अंशत:ढगाळ राहुन दि. ०५ एप्रिल २०२५ रोजी तुरळक ठीकाणी हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान ३७.० ते ३९.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २१.० ते २३.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ५४ ते ७५ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग ०४ ते १० किमी/तास राहण्याची शक्यता आहे.
विस्तारित
अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दि. ०९ ते १५ एप्रिल २०२५
दरम्यान हवामान स्वच्छ
ते अंशत:ढगाळ राहील. तसेच पर्जन्यमान सरासरीपेक्षा जास्त व कमाल तापमान मध्यम
प्रमाणात सरासरीपेक्षा कमी तर किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता
आहे.
कृषि हवामान सल्ला
ऊस
फुटवे अवस्था ते कांडे धरणे
मागील आठवड्यातील ढगाळ वातावरण व तापमानातील
चढउतारामुळे ऊस पिकात पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव दिसून येत असून याच्या
व्यवस्थापनासाठी क्लोरीपायरीफॉस २० टक्के ३० मिली किंवा फिप्रोनील ५ टक्के ३० मिली
प्रति १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ व शांत वातावरणात फवारणी करावी.
उन्हाळी बाजरी
फुटवे अवस्था
बाजरी पिकामध्ये तण व्यवस्थापन करावे व पिकास
पेरणी करून एक महिन्याचा कालावधी झाला असल्यास नत्राचा दुसरा हप्ता द्यावा. तसेच
तापमानातील होणारी वाढ लक्षात घेता पिकास गरजेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.
कांदा/लसूण
काढणी अवस्था
मागील दोन दिवसात झालेल्या पावसामुळे कांदा पीक भिजले
असल्यास त्याला ऊन द्यावे. तसेच काढणीस तयार असलेल्या कांदा पिकाची काढणी करून
घ्यावी. काढणीनंतर कांदा शेतातच पातीसह सुकू द्यावा. कांद्याच्या ओळी अशा तऱ्हेने लावाव्यात, की जेणेकरून पहिल्या ओळीतील कांदा दुसऱ्या ओळीतील पातीने झाकला जाईल.
अशा प्रकारे कांदा शेतात चार दिवस सुकू द्यावा. त्यानंतर चार सें.मी. लांब मान
ठेवून पात कापावी. चिंगळी, जोड कांदा
आलेले व खराब कांदे वेगळे काढावेत. राहिलेला कांदा सावलीत ढीग करून १५ दिवस
सुकवावा. या काळात कांद्याच्या माना वाळून पिरगळतात, वरचा पापुद्रा वाळून कांद्याला घट्ट चिकटतो. अशा प्रकारे वाळलेला
कांदा अधिक काळ चांगला टिकतो.
आंबा
फळ
वाढीची अवस्था
मागील आठवड्यातील तापमानातील चढउतार व ढगाळ
वातावरणामुळे आंबा फळावर काळे डाग दिसून येत असून याच्या व्यवस्थापानासाठी
कार्बेन्डाझिम १० टक्के + मॅन्कोझेब ६३ टक्के डब्ल्यू पी १० ग्रॅम प्रति १० लिटर
पाण्यात मिसळून स्वच्छ व शांत वातावरणात फवारणी करावी.
भाजीपाला
फुलधारणा ते फळधारणा अवस्था
मागील दोन दिवसात झालेल्या वादळीवारा व पावसामुळे टोमॅटो
पीक आडवे झाले असल्यास काठी व दोरीच्या सहाय्याने आधार द्यावा. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करुन घ्यावी. तसेच
तापमानातील चढउतारामुळे भाजीपाला पिकावर नाग अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असून
याच्या व्यवस्थापनासाठी फिप्रोनील १५ मिली किंवा सायंट्रानिलीप्रोल १०.२६ टक्के ओ.डी.
५ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
पशुसंवर्धन
वातावरणातील अचानक बदलांमुळे कोंबडयांच्या पिल्लांवर
अतिरिक्त ताण निर्माण होवून आजारी पडण्याची शक्यता असते. त्यामुळे त्यांची विशेष
काळजी घ्यावी. पिण्यासाठी स्वच्छ व मुबलक पाणी द्यावे व गरज भासल्यास पशुवैद्यकाच्या
सल्ल्याने लसीकरण करुन घ्यावे.
इतर
मागील दोन दिवसामध्ये वादळीवा-यासह झालेल्या
पावसामुळे बहूतांश ठिकाणी गळून पडलेली आंबा बागेतील फळे (कै-या) जमा करुन विक्रीसाठी
पाठवावीत. तसेच बागेतील तुटुन पडलेल्या फांद्या जमा करुन त्याची विल्हेवाट लावावी.
Comments
Post a Comment