छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक २७ सप्टेंबर ते ०१ ऑक्टोंबर २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त
झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात हवामान ढगाळ
राहून ब-याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच कमाल
तापमान २७.० ते ३१.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २२.० ते २३.० अंश सेल्सिअस
दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ६४ ते ९३ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग ०९ ते १६
किमी/तास राहण्याची शक्यता आहे.
सतर्कता : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दि. २६ सप्टेंबर २०२५
रोजी तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजेच्या कडाकडाटासह हलक्या ते मध्यम तर दि. २७ ते २९
सप्टेंबर २०२५ रोजी जोरदार ते अतिजोरदार स्वरुपाच्या
पावसाची शक्यता असुन वा-याचा वेग जास्त (३० ते ४० किमी/तास) राहील.
विस्तारित
अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दि. ०१ ते ०७ ऑक्टोंबर २०२५
दरम्यान आकाश ढगाळ राहील. तसेच पर्जन्यमान सरासरीपेक्षा अधिक तर कमाल तापमान मध्यम
प्रमाणात सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीऐवढे राहण्याची शक्यता आहे.
कृषि हवामान सल्ला
ऊस
वाढीची ते कांडे धरणे अवस्था
ऊस पीकात पाणी साचून राहणार नाही याची दक्षता
घ्यावी व अतिरिक्त साचलेल्या पाण्याचा निचरा करावा. तसेच फवारणीची कामे तीन दिवस
पुढे ढकलावीत.
कापूस
फुलधारणा ते बोंड लागणे/
बोंड वाढीची अवस्था
कापूस पीकात पाणी साचून राहणार नाही याची
दक्षता घ्यावी व अतिरिक्त साचलेल्या पाण्याचा निचरा करावा. तसेच फवारणीची कामे तीन
दिवस पुढे ढकलावीत.
मका
कणसे वाढीची ते परिपक्वता अवस्था
मका पीकात पाणी साचून राहणार नाही याची दक्षता
घ्यावी व अतिरिक्त साचलेल्या पाण्याचा निचरा करावा. तसेच फवारणीची कामे तीन दिवस
पुढे ढकलावीत.
तूर
वाढीची अवस्था
तूर पीकात पाणी साचून राहणार नाही याची दक्षता
घ्यावी व अतिरिक्त साचलेल्या पाण्याचा निचरा करावा. तसेच फवारणीची कामे तीन दिवस
पुढे ढकलावीत.
सिताफळ
फळवाढीची अवस्था
सिताफळ बागेत पाणी साचून राहणार नाही याची
दक्षता घ्यावी व अतिरिक्त साचलेल्या पाण्याचा निचरा करावा. काढणीस तयार असलेल्या सिताफळांची
लवकरात लवकर काढणी करुन घ्यावीत. काढणीनंतर सिताफळ प्रतवारी करुन बाजारपेठेत
विक्रीस पाठवावीत.
भाजीपाला
फळधारणा ते फळवाढीची अवस्था
भाजीपाला पीकात पाणी साचून राहणार नाही याची
दक्षता घ्यावी व अतिरिक्त साचलेल्या पाण्याचा निचरा करावा. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पीकांची लवकरात लवकर काढणी करुन
घ्यावी व काढणीनंतर प्रतवारी करुन बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवावेत.
पशुसंवर्धन
सध्यस्थितीत शेळ्यांमध्ये
जुलाब/हगवण लागल्याचे दिसत असुन याच्या व्यवस्थापनासाठी २ चमचे ग्लुकोज, २ चमचे मीठ, २ चमचे खाण्याचा सोडा, २ चमचे लिंबाचा रस २ लिटर
पाण्यामध्ये मिसळून द्रावण तयार करून आजारी शेळ्यांना पाजावे. तसेच जनावरांच्या
खाद्यामध्ये ओल्या चा-याबरोबर कोरडया चा-याचा समावेश करावा.
इतर
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दि. २६ सप्टेंबर २०२५
रोजी तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजेच्या कडाकडाटासह हलक्या ते मध्यम तर दि. २७ ते २९
सप्टेंबर २०२५ रोजी जोरदार ते अतिजोरदार स्वरुपाच्या
पावसाची शक्यता असुन शेतकरी बांधवानी पीकांमधील व फळबागेतील साचलेल्या पाण्याचा निचरा करावा व पीकात पाणी साचणार नाही
याची दक्षता घ्यावी तसेच पाऊस चालू असतांना शेतात जाणे टाळावे व पशुधनाची काळजी
घ्यावी.
सदर कृषि सल्लापत्रिका वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विदयापीठ, परभणी अंतर्गत असलेल्या जिल्हा कृषि हवामान केंद्र (DAMU), कृषि विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर-१ येथील तज्ञ समितीच्या शिफारशी वरून तयार करून प्रसारित करण्यात आलेली आहे.

Comments
Post a Comment