छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याकरिता दिनांक २२ ते २६ एप्रिल २०२३ साठी हवामान अंदाज
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात हवामान स्वच्छ ते अंशत:ढगाळ राहून दि. २२,२५ व २६ एप्रिल २०२३ रोजी तुरळक ठिकाणी अतिशय हलक्या ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान ३८.० ते ३९.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान १८.० ते १९.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता २२ ते ५९ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग १० ते १८ किमी/तास राहण्याची शक्यता आहे.
विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दिनांक २६ एप्रिल ते ०२ मे २०२३ दरम्यान हवामान स्वच्छ ते अंशत:ढगाळ राहील. तसेच पर्जन्यमान सरासरीपेक्षा अधिक व कमाल तापमान माध्यम प्रमाणात सरासरी पेक्षा कमी तर किमान तापमान सरासरी पेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.
कृषि हवामान सल्ला
ऊस
कांडे धरणे
मागील
आठवड्यातील ढगाळ वातावरणामुळे ऊस पिकात पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव दिसून येत
असून याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरीपायरीफॉस २० टक्के ३० मिली किंवा फिप्रोनील ५
टक्के ३० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ व शांत वातावरणात फवारणी
करावी. तसेच ऊस पिकास योग्य वेळेच्या अंतराने गरजेनुसार
पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.
उन्हाळी बाजरी
वाढीची
ते पोटरी अवस्था
बाजरी
पिकामध्ये गरजेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.
आंबा
फळ वाढीची अवस्था
मागील
आठवड्यातील तापमानातील चढउतार व ढगाळ वातावरणामुळे आंबा फळावर काळे डाग दिसून येत
असून याच्या व्यवस्थापानासाठी कार्बेन्डाझिम १० टक्के + मॅन्कोझेब ६३ टक्के
डब्ल्यू पी १० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ व शांत वातावरणात फवारणी
करावी.
भाजीपाला
फुले ते फळधारणा
अवस्था
मागील
आठवड्यातील तापमानातील चढउतार व ढगाळ वातावरणामुळे टोमॅटो पिकामध्ये फुलकिडीचा
प्रादुर्भाव दिसून येत असून याच्या व्यवस्थापनासाठी थायमिथॉक्झाम २५ डब्लूसी ४
मिली किंवा डायमिथोएट ३० टक्के २० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ व
शांत वातावरणात फवारणी करावी. तसेच भाजीपाला पिकामध्ये गरजेनुसार पाणी व्यवस्थापन
करावे.
चारा पिके
चारा पिकास
गरजेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.
पशुसंवर्धन
तापमानात
वाढ होत असल्यामुळे कोंबडयांच्या शेडमधील तापमान नियंत्रित करुन पाण्याच्या
भांड्यांच्या संख्या वाढवावी व पीण्यासाठी स्वच्छ व थंड पाणी दयावे. तसेच
उष्णतेपासून त्रास होऊ नये म्हणून कोंबड्याना खाद्य सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेत
द्यावे.
इतर
शेतकरी
बांधवांनी रब्बी पिकांच्या काढणीनंतर शेतातील धसकटे, काडीकचरा गोळा करुन जमीन
स्वच्छ करुन घ्यावी. तसेच मागील दोन वर्षी नांगरणी केली नसल्यास खोल नांगरणी करुन
घ्यावी. जेणेकरुन नांगरटीनंतर जमीन उन्हात तापून जमीनीतील किड व रोगकारक
बुरशींच्या सुप्तावस्था नष्ट होण्यास मदत होईल.
Comments
Post a Comment