औरंगाबाद जिल्ह्याकरिता दिनांक १९ ते २३ जुलै २०२३ साठी हवामान अंदाज व कृषी हवामान सल्ला

 प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार औरंगाबाद जिल्हयात पुढील पाच दिवसात आकाश ढगाळ राहून व्यापक प्रमाणात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान २८.० ते ३०.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २०.० ते २२.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ५७ ते ८७ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग २० ते २५ किमी/तास राहण्याची शक्यता आहे.

सर्तकता : औरंगाबाद जिल्हयात दि. १८ जुलै २०२३ रोजी तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजेच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता असुन वा-याचा वेग जास्त (३० ते ४० किमी/तास) राहण्याची तर दि. १९ जुलै २०२३ रोजी तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.

विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) औरंगाबाद जिल्हयात दि. २३ ते २९ जुलै २०२३ दरम्यान आकाश अंशतः ढगाळ ते ढगाळ राहून पर्जन्यमान सरासरीपेक्षा जास्त तर कमाल तापमान सरासरी पेक्षा कमी व किमान तापमान सरासरी ऐवढे राहण्याची शक्यता आहे.

कृषी हवामान सल्ला

सोयाबीन

रोप ते वाढीची अवस्था

सोयाबीन पिकामध्ये झाडांची संख्या योग्य राखण्यासाठी तुट भरावी. तसेच पिकामध्ये कोळपणी व तणनियंत्रणाचे कामे स्वच्छ वातावरण व शेतात वापसा असताना करून घ्यावीत. 

खरीप ज्वारी

रोप ते वाढीची अवस्था

खरीप ज्वारी पिकामध्ये झाडांची संख्या योग्य राखण्यासाठी तुट भरावी. तसेच पिकामध्ये कोळपणी व तणनियंत्रणाचे कामे स्वच्छ वातावरण व शेतात वापसा असताना करून घ्यावीत. 

बाजरी

रोप ते वाढीची अवस्था

बाजरी पिकामध्ये झाडांची संख्या योग्य राखण्यासाठी तुट भरावी. तसेच पिकामध्ये कोळपणी व तणनियंत्रणाचे कामे स्वच्छ वातावरण व शेतात वापसा असताना करून घ्यावीत. 

खरीप भुईमूग 

रोप ते वाढीची अवस्था

खरीप भुईमूग पिकामध्ये झाडांची संख्या योग्य राखण्यासाठी तुट भरावी. तसेच पिकामध्ये कोळपणी व तणनियंत्रणाचे कामे स्वच्छ वातावरण व शेतात वापसा असताना करून घ्यावीत. 

आद्रक

वाढीची अवस्‍था

आद्रक पिकामध्ये तण व्यवस्थापन करावे व बेडला हलकी भर द्यावी. 

हळद

वाढीची अवस्‍था

हळद पिकामध्ये तण व्यवस्थापन करावे व बेडला हलकी भर द्यावी. 

मोसंबी

फळ वाढीची अवस्‍था

पाऊस व ढगाळ वातावरणामुळे मोसंबी फळबागेमध्ये बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊन फळगळ होण्याची शक्यता असते, यासाठी प्रतीबंधात्मक उपाय म्हणुन कार्बेनडेझीम २० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ वातावरणात फवारणी करावी.

डाळिंब

फळ वाढीची अवस्‍था

मागील आठवड्यातील ढगाळ हवामान तसेच वातावरणातील आर्द्रता जास्त असल्यामुळे डाळिंब बागेत तेल्या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे याच्या व्यवस्थापनासाठी कॉपर ऑक्सिक्लोराईड २५ ग्रॅम + स्ट्रेप्टोसायक्लीन किंवा ब्रॉनोपॉल ०५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ वातावरणात फवारणी करावी.

भाजीपाला

फुल ते फळ धारणा अवस्था

ढगाळ वातावरणामुळे टोमॅटो पिकावर नाग अळीच्या प्रादुर्भाव दिसून येत असून याच्या व्यवस्थापनासाठी सायनॅन्ट्रीनिलिप्रॉल १०.२६. % ओडी १८ मिली किंवा थायमिथॉक्झाम २५ % डब्ल्यूपी ४ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ वातावरणात फवारणी करावी. तसेच मिरची पिकामधील मर रोगाच्या व्यवस्थापनासाठी कॉपर ऑक्झिक्लोराईड ५० टक्के  ३० ग्रॅम १० लीटर पाण्यात मिसळून आळवणी करावी.

तुती रेशीम

पावसाळयात ढगाळ वातावरणात संगोपन गृहातील तापमान २२ अं.से ते २८ अं.से. च्या दरम्यान ठेवावे आणि आर्द्रता ८० ते ८५ टक्के ठेवावी. जास्त तापमान व आर्द्रता राहिल्यास रेशीम किटकांवर ग्रासरी रोगाचा प्रादूर्भाव जाणवतो. किटकांचे (अळीचे) शरीर सुजल्यासारखे होते. दूधाळ द्रव बाहेर पडतो. रॅकवर जास्त ओला पाला जास्त प्रमाणात टाकु नये. फांदया खादय आवश्यकतेप्रमाणे दिवसातुन तीन वेळा दयावे. दोन कोषाच्या पिकाच्या दरम्यान आठ दिवसाचा खंड ठेवावा आणि निर्जंतुकीकरण द्रावण २०० मिली प्रति चौरस मीटर याप्रमाणे संगोपन गृहाच्या आत चारही बाजूने व रॅकवर फवारुन घ्यावे. असे ५० ग्रॅम १०० लिटर पाण्यासोबत किंवा सॅनिटेक (क्लोरीन डायऑक्साईड) २.५ टक्के किंवा २ टक्के ब्लीचींग पावडर + चूना द्रावण ०.३ टक्के (१० लिटर मध्ये २०० मिली ब्लीचींग पावडर + ३० ग्रॅम चूना द्रावण) प्रमाणे फवारणी करावी.

पशुसंवर्धन

सद्यस्थितीत शेळ्यांच्या प्रवेशद्वाराजवळ तसेच शेडमध्ये चुना टाकावा जेणेकरून बाहेरून येणाऱ्या रोगांचा प्रादुर्भाव कमी होईल. तसेच  शेळ्या व शेळ्यांची पिले खनिजाच्या अभावामुळे माती चाटतात त्यामुळे त्यांना हगवण सदृष्य यासारखे आजार होतात ते टाळण्यासाठी शेळ्यांना व पिल्लाना पावसाळ्यातसुद्धा खनिज मिश्रण किंवा चाटण वीट चालू ठेवावे.

इतर

औरंगाबाद जिल्हयामध्ये दि. १८ व १९ जुलै २०२३ रोजी तुरळक ठिकाणी वादळीवारा व विजेच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असल्यामुळे शेतकरी बांधवांनी पिकांमधील कोळपणी व फवारणीची कामे दोन दिवस पुढे ढकलावीत.

सदर कृषि सल्ला पत्रिका जिल्हा कृषि हवामान केंद्र (DAMU) कृषि विज्ञान केंद्र, औरंगाबाद-१ येथील तज्ञ समितीच्या शिफारशीवरून तयार करून प्रसारित करण्यात आलेली आहे.

Comments

Popular posts from this blog

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ०२ ते ०६ एप्रिल २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याकरिता दिनांक १९ ते २३ ऑक्टोंबर २०२४ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक १५ ते १९ जानेवारी २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला