छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याकरिता दिनांक ०९ ते १३ एप्रिल २०२४ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात हवामान अंशत:ढगाळ राहून तुरळक ठिकाणी अतिशय हलक्या ते हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान ३९.० ते ४०.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २०.० ते २१.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ११ ते ४८ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग १० ते १३ किमी/तास राहण्याची शक्यता आहे.
विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती
संभाजीनगर जिल्हयात दि. ०४ ते १६ एप्रिल २०२४ दरम्यान आकाश स्वच्छ अंशत:ढगाळ
राहण्याची शक्यता आहे. तसेच पर्जन्यमान सरासरीपेक्षा जास्त तसेच कमाल तापमान मध्यम
प्रमाणात सरासरीपेक्षा कमी तर किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता
आहे.
कृषी हवामान सल्ला
उन्हाळी मका
वाढीची अवस्था
उन्हाळी मका पिकातील आंतरमशागत
व तण व्यवस्थापन करून घ्यावे. तसेच पेरणी करून एक महिन्याचा कालावधी झाला असल्यास
७५ किलो नत्र प्रति हेक्टरी युरियाद्वारे द्यावे.
मोसंबी
फळवाढीची अवस्था
सध्यस्थितीत
तापमानात किंचित वाढ होत असल्यामुळे मोसंबी बागेत कोळी किडींच्या प्रादुर्भाव
दिसून येत असून याच्या व्यवस्थापनासाठी इथिऑन २० ईसी २० मिली किंवा विद्राव्य गंधक
३० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच मोसंबी बागेस पाण्याचा
ताण बसणार नाही याची काळजी घ्यावी व बागेस गरजेनुसार पाणी व्यवस्थापन करावे तसेच बागेत
ओलावा टिकून राहण्यासाठी पिकांचे अवशेष, पालापाचोळा या आच्छादनाचा वापर करावा.
डाळिंब
फळवाढीची अवस्था
डाळींब बागेमध्ये फळांचा आकारामध्ये वाढ होण्याकरिता सूक्ष्म
अन्नद्रव्याची १.० ते १.५
किलो प्रति हेक्टर या प्रमाणात पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच सध्यस्थितीत
तापमानातील संभाव्य वाढ लक्षात घेता डाळिंब बागेस पाण्याचा ताण बसणार नाही याची
काळजी घ्यावी व बागेस गरजेनुसार पाणी व्यवस्थापन करावे तसेच बागेत पिकांचे
अवशेष/गवताचे आच्छादनाचा वापर करावा.
भाजीपाला
फुलधारणा ते फळधारणा अवस्था
तापमानात होत असलेली वाढ लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी भाजीपाला पिकाला सकाळी व
संध्याकाळी पाणी द्यावे. तसेच मिरची पिकावरील पांढ-या माशीच्या व्यवस्थापनासाठी
फेन्प्रोपॅथ्रीन ३० ईसी ३.५ मिली किंवा पायरीप्रॉक्झीफेन १० टक्के ईसी ४ मिली
प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
तुती रेशीम
वाढीची अवस्था
रेशीम कोष
काढणीनंतर कोष वाळवून साठवून ठेवण्यासाठी कडक उन्हामध्ये पातळ सुटी कपड्याचे
आच्छादन करून वाळवावे. मुंग्यांच्या प्रादुर्भावापासून कोशाचे संरक्षण करावे.पाच
दिवस कोष वाळल्यानंतर साठवणुकीच्या घरात व बारदाण्यावर डेल्टामेथ्रीन ४ मिली
प्रति १० लिटर पाण्यत मिसळून फवारावे.
पशुसंवर्धन
सध्यस्थितीत
तापमानातील संभाव्य वाढ लक्षात घेता शेतक-यांनी पशुधनाचे उन्हापासून संरक्षण
करण्यासाठी दिवसा जनावरे झाडांच्या सावलीत बांधावीत. तसेच कोंबडयांच्या शेडमधील
तापमान नियंत्रित करुन पाण्याच्या भांड्यांच्या संख्या वाढवावी व पीण्यासाठी
स्वच्छ व थंड पाणी दयावे. तसेच उष्णतेपासून त्रास होऊ नये म्हणून कोंबड्याना खाद्य
सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेत द्यावे. तसेच वाळलेल्या
चा-यापेक्षा हिरव्या चा-यामध्ये २ ते ३ पट अधिक स्फुरदाचे प्रमाण असते. त्यामुळे
शेतक-यांनी सद्यस्थितीत जनावरांच्या आहारात वाळलेल्या चा-यासोबत हिरव्या चा-याचा
समावेश करावा. जेणेकरुन जनावरांमधील
स्फुरदाचे प्रमाण योग्य राखले जाईल.
इतर
सद्यस्थितीत तापमानात वाढ होत असुन शेतक-यांनी
पाण्याच्या उपलब्धतेनुसार पिकांना व फळबागेस सकाळ व सायंकाळच्या वेळेस संरक्षित
सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. तसेच शेतकरी व शेतमजूर यांनी शेतात काम करताना प्रखर
सूर्य प्रकाश असताना दुपारच्या वेळेत काम करणे टाळावे.
Comments
Post a Comment