छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याकरिता दिनांक ०४ ते ०८ मे २०२४ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात हवामान स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान ४०.० ते ४२.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २४.० ते २५.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता १४ ते ३१ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग १५ ते २१ किमी/तास राहण्याची शक्यता आहे.
विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती
संभाजीनगर जिल्हयात दिनांक ०८ ते १४ मे २०२४ दरम्यान हवामान स्वच्छ ते अंशत:ढगाळ
राहील. तसेच पर्जन्यमान सरासरीपेक्षा
जास्त तर कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी तर व
किमान तापमान सरासरी एवढे राहण्याची शक्यता आहे.
कृषि
हवामान सल्ला
ऊस
कांडे धरणे
सध्यस्थितीत
तापमानातील संभाव्य वाढ लक्षात घेता ऊस पिकास योग्य वेळेच्या अंतराने गरजेनुसार
पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.
उन्हाळी बाजरी
दाणे भरणे अवस्था
बाजरी पिकामध्ये गरजेनुसार
पाणी व्यवस्थापन करावे.
आंबा
फळ वाढीची ते काढणी अवस्था
काढणीस तयार असलेल्या आंबा फळांची सकाळ
व सायंकाळच्या वेळेस काढणी करुन घ्यावी. आंबा फळांची काढणी देठासहित करावी जेणेककरुन फळांचे काढणी पश्चात आयुष्य
वाढून पक्वता एकावेळेस होण्यास मदत होते. तसेच आंबा पिकाचे फळ माशीपासून संरक्षण
करण्यासाठी फळमाशी सापळे ०४ प्रति हेक्टर या प्रमाणात वापरावे.
भाजीपाला
फुले ते
फळधारणा अवस्था
सध्यस्थितीत
तापमानातील संभाव्य वाढ लक्षात घेता भाजीपाला पिकास गरजेनुसार पाणी व्यवस्थापन
करावे. तसेच मिरची पीकावरील विषाणूजन्य चूरडामुरडा रोगाच्या व्यवस्थापनासाठी
प्रादूर्भावग्रस्त झाडे नष्ट करावीत. तसेच पायरीप्रोक्सीफेन १० टक्के ईसी २० मिली
किंवा फेनप्रोपाथ्रीन ३० टक्के ईसी ३० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी
करावी. फवारणी शक्यतो सकाळी किंवा सायंकाळी करावी. उन्हामध्ये फवारणी करू नये.
काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची काढणी सकाळी लवकर करावी.
चारा पिके
वाढीची
अवस्था
चारा पिकास
गरजेनुसार पाणी व्यवस्थापन करावे. तसेच काढणीस तयार असलेला हिरवा चारा कापणी करुन जनावरांना
दुपारच्या वेळेस खाण्यास द्यावा.
पशुसंवर्धन
तापमानात
वाढ होत असल्यामुळे कोंबडयांच्या शेडमधील तापमान नियंत्रित करुन पाण्याच्या
भांड्यांच्या संख्या वाढवावी व पीण्यासाठी स्वच्छ व थंड पाणी दयावे. तसेच
उष्णतेपासून त्रास होऊ नये म्हणून कोंबड्याना खाद्य सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेत
द्यावे. तापमानात वाढ होत असुन शेतकरी बांधवांनी जनावरांना दिवसा उन्हात चरावयास
नेऊ नये व पिण्यास भरपुर प्रमाणात स्वच्छ व थंड पाणी द्यावे.
इतर
सद्यस्थितीत तापमानात वाढ होत असुन शेतक-यांनी पाण्याच्या उपलब्धतेनुसार
पिकांना व फळबागेस सकाळ व सायंकाळच्या वेळेस संरक्षित सिंचन पध्दतीने पाणी द्यावे.
तसेच शेतकरी व शेतमजूर यांनी शेतात काम करताना प्रखर सूर्य प्रकाश असताना
दुपारच्या वेळेत काम करणे टाळावे.
Comments
Post a Comment