छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ०२ ते ०६ एप्रिल २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात हवामान अंशत:ढगाळ ते ढगाळ राहून दि. ०६ एप्रिल २०२५ वगळता इतर दिवशी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान ३५.० ते ३७.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २२.० ते २५.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ३८ ते ५९ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग ०३ ते ०६ किमी/तास राहण्याची शक्यता आहे.
सर्तकता : छत्रपती संभाजीनगर
जिल्ह्यात दिनांक १ ते ३ एप्रिल २०२५ दरम्यान तुरळक ठिकाणी गारपीट, वादळीवारा
व विजेच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता असुन वा-याचा वेग जास्त (५०-६० किमी/तास) राहण्याची शक्यता आहे.
विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस)
छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दिनांक ०६ ते १२ एप्रिल २०२५ दरम्यान हवामान स्वच्छ ते
अंशत:ढगाळ राहण्याची शक्यता असुन पर्जन्यमान सरासरीपेक्षा कमी तसेच कमाल तापमान व
किमान तापमान सरासरीऐवढे राहण्याची शक्यता आहे.
कृषी हवामान सल्ला
उन्हाळी मका
वाढीची अवस्था
उन्हाळी मका पिकातील आंतरमशागत व तण व्यवस्थापनाची कामे पावसाची उघाड बघून
करावी.
मोसंबी
फळवाढीची अवस्था
मोसंबी बागेत कोळी किडींच्या प्रादुर्भाव दिसून येत असून याच्या
व्यवस्थापनासाठी इथिऑन २० ईसी २० मिली किंवा विद्राव्य गंधक ३० ग्रॅम प्रति १०
लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. तसेच नवीन लागवड केलेल्या
रोपांना काठीच्या सहाय्याने आधार द्यावा.
डाळिंब
फळवाढीची अवस्था
डाळींब बागेमध्ये फळांचा आकारामध्ये वाढ होण्याकरिता सूक्ष्म
अन्नद्रव्याची १.० ते १.५ किलो प्रति
हेक्टर या प्रमाणात पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.
तसेच नवीन लागवड केलेल्या रोपांना काठीच्या सहाय्याने आधार द्यावा.
भाजीपाला
फुलधारणा ते फळधारणा अवस्था
दि. ०१ ते ०३
एप्रिल २०२५ रोजी वादळीवा-यासह गारपीट होण्याची शक्यता असून काढणीस तयार असलेल्या
भाजीपाला पीकाची काढणी लवकरात लवकर करुन घ्यावी. तसेच टोमॅटो पीकास दोरी व
काठीच्या सहाय्याने आधार द्यावा.
तुती रेशीम
वाढीची अवस्था
दि. ०१ ते ०३
एप्रिल २०२५ रोजी वादळीवा-यासह गारपीट होण्याची शक्यता असल्यामुळे शेतकरी बांधवांनी
रेशीम शेडमध्ये पाणी शिरणार नाही याची काळजी घ्यावी.
पशुसंवर्धन
दि. ०१ ते ०३
एप्रिल २०२५ रोजी वादळीवा-यासह गारपीट होण्याची शक्यता असून पावसाचा अंदाज दिसताच
शेतकरी बांधवांनी जनावरांना बाहेर न बांधता गोठयात बांधावे. वादळीवारा आणि
विजांच्या कडकडाटाच्या वेळी जनावरांना बाहेर चरण्यासाठी सोडू नये.
इतर
पुढील पाच दिवसाचा हवामानाचा अंदाज पाहता गारपीट तसेच वादळीवारा व
विजेच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता असल्यामुळे शेतकरी
बांधवांनी काढणीस तयार असलेल्या गहू,
कांदा, लसून आदी पिकांची काढणी लवकरात लवकर करुन घ्यावी. तसेच
काढणी केलेल्या पीकांची सुरक्षित ठीकाणी साठवणूक करावी. पीक उघडयावर असल्यास ताडपत्रीच्या सहाय्याने झाकून ठेवावे, जेणेकरुन
पीकांचे होणारे संभाव्य नुकसान टाळता येईल.
Comments
Post a Comment