छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक १२ ते १६ एप्रिल २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात हवामान स्वच्छ ते अंशत:ढगाळ राहुन दि. १३ एप्रिल २०२५ रोजी तुरळक ठीकाणी हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान ३९.० ते ४१.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २२.० ते २६.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ३२ ते ५३ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग ११ ते १३ किमी/तास राहण्याची शक्यता आहे.
सर्तकता :
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दिनांक १२ एप्रिल २०२५ दरम्यान तुरळक ठिकाणी
वादळीवारा व विजेच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता असुन
वा-याचा वेग जास्त (४०-५० किमी/तास) राहण्याची शक्यता आहे.
विस्तारित
अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दि. १६ ते २२ एप्रिल २०२५
दरम्यान हवामान स्वच्छ
ते अंशत:ढगाळ राहील. तसेच पर्जन्यमान सरासरीपेक्षा जास्त तर कमाल तापमान व किमान
तापमान सरासरीऐवढे राहण्याची शक्यता आहे.
कृषि हवामान सल्ला
ऊस
फुटवे अवस्था ते कांडे धरणे
मागील आठवड्यातील ढगाळ वातावरण व तापमानातील
चढउतारामुळे ऊस पिकात पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव दिसून येत असून याच्या
व्यवस्थापनासाठी क्लोरीपायरीफॉस २० टक्के ३० मिली किंवा फिप्रोनील ५ टक्के ३० मिली
प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
उन्हाळी बाजरी
पोटरी ते कणसे धरणे अवस्था
तापमानातील होणारी वाढ लक्षात घेता पिकास
गरजेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.
कांदा/लसूण
काढणी अवस्था
काढणीस तयार असलेल्या कांदा पिकाची काढणी करून
घ्यावी. काढणीनंतर कांदा शेतातच पातीसह सुकू द्यावा. कांद्याच्या ओळी अशा तऱ्हेने लावाव्यात, की जेणेकरून पहिल्या ओळीतील कांदा दुसऱ्या ओळीतील पातीने झाकला जाईल.
अशा प्रकारे कांदा शेतात चार दिवस सुकू द्यावा. त्यानंतर चार सें.मी. लांब मान
ठेवून पात कापावी. चिंगळी, जोड कांदा
आलेले व खराब कांदे वेगळे काढावेत. राहिलेला कांदा सावलीत ढीग करून १५ दिवस
सुकवावा. या काळात कांद्याच्या माना वाळून पिरगळतात, वरचा पापुद्रा वाळून कांद्याला घट्ट चिकटतो. अशा प्रकारे वाळलेला
कांदा अधिक काळ चांगला टिकतो.
आंबा
फळ
वाढीची अवस्था
मागील आठवड्यातील तापमानातील चढउतार आंबा फळावर काळे
डाग दिसून येत असून याच्या व्यवस्थापानासाठी कार्बेन्डाझिम १० टक्के + मॅन्कोझेब
६३ टक्के डब्ल्यू पी १० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ व शांत
वातावरणात फवारणी करावी.
भाजीपाला
फुलधारणा ते फळधारणा अवस्था
मागील आठवड्यातील तापमानातील चढउतारामुळे टोमॅटो
पिकामध्ये फुलकिडीचा प्रादुर्भाव दिसून येत असून याच्या व्यवस्थापनासाठी
थायमिथॉक्झाम २५ डब्लूसी ४ मिली किंवा डायमिथोएट ३० टक्के २० मिली प्रति १० लिटर
पाण्यात मिसळून स्वच्छ व शांत वातावरणात फवारणी करावी. तसेच
भाजीपाला पिकात रस शोषण करणाऱ्या किडीच्या व्यवस्थापनासाठी पिवळे व निळे चिकट
सापळे (छोट्या आकाराची) एकरी २५ ते ३० या प्रमाणात लावावेत.
पशुसंवर्धन
तापमानात वाढ होत असल्यामुळे कोंबडयांच्या शेडमधील
तापमान नियंत्रित करुन पाण्याच्या भांड्यांच्या संख्या वाढवावी व पीण्यासाठी
स्वच्छ व थंड पाणी दयावे. तसेच उष्णतेपासून त्रास होऊ नये म्हणून कोंबड्याना खाद्य
सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेत द्यावे. तापमानात वाढ होत असुन शेतकरी बांधवांनी
जनावरांना दिवसा उन्हात चरावयास नेऊ नये व पिण्यास भरपुर प्रमाणात स्वच्छ व थंड पाणी
द्यावे.
इतर
दिनांक १२ एप्रिल २०२५ दरम्यान तुरळक ठिकाणी वादळीवारा व विजेच्या
कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता असल्यामुळे शेतकरी
बांधवांनी काढणी केलेली कांदा, लसुन यासारखी पीके शेतामध्ये उघडयावर असतील तर ती
ताडपत्रीच्या सहाय्याने झाकुण ठेवावीत.
तसेच शेतातील कामे सकाळ व सायंकाळच्या वेळेतच
करावीत. तसेच मागील दोन वर्षी नांगरणी केली नसल्यास खोल
नांगरणी करुन घ्यावी. जेणेकरुन नांगरटीनंतर जमीन उन्हात तापून जमीनीतील किड व
रोगकारक बुरशींच्या सुप्तावस्था नष्ट होण्यास मदत होईल. तसेच नांगरणी केलेल्या
शेतामध्ये रोटाव्हेटरचा वापर करणे टाळावे.
Comments
Post a Comment