छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक १८ ते २२ एप्रिल २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात हवामान स्वच्छ राहील. तसेच कमाल तापमान ४१.० ते ४३.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २४.० ते २७.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता १८ ते ५६ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग १४ ते १७ किमी/तास राहण्याची शक्यता आहे.
सर्तकता : छत्रपती
संभाजीनगर जिल्ह्यात दिनांक १७ व २१ एप्रिल २०२५ रोजी तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान
राहण्याची शक्यता आहे.
विस्तारित
अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दि. २० ते २६ एप्रिल २०२५
दरम्यान हवामान स्वच्छ
ते अंशत:ढगाळ राहील. तसेच पर्जन्यमान सरासरीपेक्षा कमी तर कमाल तापमान व किमान
तापमान सरासरीऐवढे राहण्याची शक्यता आहे.
कृषि हवामान सल्ला
ऊस
फुटवे अवस्था ते कांडे धरणे
मागील आठवड्यातील ढगाळ वातावरण व तापमानातील
चढउतारामुळे ऊस पिकात पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव दिसून येत असून याच्या
व्यवस्थापनासाठी क्लोरीपायरीफॉस २० टक्के ३० मिली किंवा फिप्रोनील ५ टक्के ३० मिली
प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच सुरु ऊस पीकाची
लागवड करुन ३ ते ४ महिने झालेले असल्यास प्रतिहेक्टरी २५ किलो नत्र युरीयाव्दारे
द्यावे. तसेच ऊस पिकास योग्य वेळेच्या अंतराने गरजेनुसार पाण्याच्या पाळ्या
द्याव्यात.
उन्हाळी बाजरी
पोटरी ते कणसे धरणे अवस्था
तापमानातील होणारी वाढ लक्षात घेता पिकास
गरजेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.
आंबा
फळ
वाढीची अवस्था
काढणीस तयार असलेल्या आंबा फळांची सकाळ व
सायंकाळच्या वेळेस काढणी करुन घ्यावी. आंबा फळांची काढणी देठासहित करावी जेणेककरुन
फळांचे काढणी पश्चात आयुष्य वाढून पक्वता एकावेळेस होण्यास मदत होते. तसेच आंबा
पिकाचे फळ माशीपासून संरक्षण करण्यासाठी फळमाशी सापळे ०४ प्रति हेक्टर या प्रमाणात
वापरावे.
भाजीपाला
फुलधारणा ते फळधारणा अवस्था
मागील आठवड्यातील तापमानातील चढउतारामुळे वांगी
पिकावरील शेंडा व फळ पोखरणाऱ्या अळीच्या व्यवस्थापनासाठी क्लोरानट्रॅनिलीप्रोल
१८.५ टक्के एससी ४ मिली किंवा क्लोरोपायरीफॉस २० टक्के इसी २० मिली प्रति १० लिटर
पाण्यात मिसळून सकाळी किंवा सायंकाळच्या वेळेत स्वच्छ वातावरणात फवारणी करावी. तसेच
भाजीपाला पिकात रस शोषण करणाऱ्या किडीच्या व्यवस्थापनासाठी पिवळे व निळे चिकट
सापळे (छोट्या आकाराची) एकरी २५ ते ३० या प्रमाणात लावावेत.
पशुसंवर्धन
तापमानात वाढ होत असल्यामुळे कोंबडयांच्या शेडमधील
तापमान नियंत्रित करुन पाण्याच्या भांड्यांच्या संख्या वाढवावी व पीण्यासाठी
स्वच्छ व थंड पाणी दयावे. तसेच उष्णतेपासून त्रास होऊ नये म्हणून कोंबड्याना खाद्य
सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेत द्यावे. तापमानात वाढ होत असुन शेतकरी बांधवांनी
जनावरांना दिवसा उन्हात चरावयास नेऊ नये व पिण्यास भरपुर प्रमाणात स्वच्छ व थंड पाणी
द्यावे.
इतर
सद्यस्थितीत तापमानात वाढ होत असुन शेतक-यांनी पाण्याच्या उपलब्धतेनुसार
पिकांना व फळबागेस सकाळ व सायंकाळच्या वेळेस संरक्षित सिंचन पध्दतीने पाणी द्यावे.
तसेच शेतकरी व शेतमजूर यांनी शेतात काम करताना प्रखर सूर्य प्रकाश असताना
दुपारच्या वेळेत काम करणे टाळावे.
Comments
Post a Comment