छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ११ ते १५ ऑक्टोंबर २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार
छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात आकाश स्वच्छ राहील. तसेच कमाल तापमान
३३.० ते ३५.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान १७.० ते १९.० अंश सेल्सिअस दरम्यान
राहील व सापेक्ष आर्द्रता ४७ ते ६२ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग ०३ ते ०५ किमी/तास
राहण्याची शक्यता आहे.
विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर
जिल्हयात दि. १५ ते २१ ऑक्टोंबर २०२५ दरम्यान आकाश स्वच्छ राहील. तसेच पर्जन्यमान सरासरीऐवढे,कमाल
तापमान सरासरीपेक्षा कमी तर किमान तापमान सरासरीऐवढे राहण्याची शक्यता आहे.
कृषि हवामान सल्ला
ऊस
कांडे धरणे ते कांडे वाढीची
अवस्था
मागील आठवड्यातील दमट वातावरणामुळे ऊस पिकामध्ये लोकरी मावा किडीचा
प्रादुर्भाव दिसून येत असून याच्या व्यवस्थापनासाठी मोनोक्रोटोफॉस ३६ टक्के एस.एल.
१० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
कापूस
बोंड लागणे/ बोंड वाढीची
अवस्था
मागील आठवड्यातील दमट वातावरणामुळे कापुस पिकामध्ये
पातेगळ दिसुन येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी नॅप्थॅलिक ॲसिटीक ॲसिड (एनएए) २ ते २.५ मिली प्रति १० लिटर पाण्यात
मिसळुन फवारणी करावी. तसेच कापुस पीकावरील गुलाबी/शेंदरी बोंडअळीच्या प्रादूर्भावावर लक्ष ठेवावे. त्यासाठी
प्रति हेक्टरी ५ कामगंध सापळे लावावेत. कापुस पिकातील डोमकळया दिसल्यास वेचून नष्ट
कराव्यात.
मका
परिपक्वता ते काढणी अवस्था
मका पिकाची काढणी कणसावरील आवरण पिवळसर पांढरे आणि
दाणे टणक झाल्यावर करावी. त्यासाठी ताटे न कापता प्रथम कणसे सोलून खुडून घ्यावीत
आणि सोललेली कणसे दोन तीन दिवस उन्हात चांगली वाळवावीत. त्यानंतर कणसातील दाणे
काढण्यासाठी मका सोलणी यंत्राचा वापर करावा. सोलणी यंत्राने दाणे काढल्यानंतर मका
दाण्यात ओलाव्याचे प्रमाण १०-१२ टक्के इतके होईपर्यंत उन्हात चांगले वाळवावे
म्हणजे साठवणुकीत किडीमुळे होणारे नुकसान टाळता येईल.
तूर
फांद्या धरणे ते फुलधारणा
अवस्था
मागील आठवडयातील ढगाळ वातावरण व पावसामुळे तुर
पीकाच्या खोडावर काळे डाग व खाचा पडुन झाड हळूहळू वाळायला लागते हा फायटोप्थोरा
रोग असुन याच्या व्यवस्थापनासाठी मेटालॅक्झील एम ४ टक्के + मॅन्कोझेब
६४ टक्के २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळुन स्वच्छ वातावरणात फवारणी करावी.
रब्बी ज्वारी
जमीनीची व वाणांची निवड
रब्बी ज्वारी पेरणीसाठी मध्यम ते भारी, पाण्याचा
योग्य निचरा होणारी व पाणी साठवून ठेवणारी जमीन निवडावी. जमिनीचा सामू सर्वसाधारण
५.५ ते ८.५ असावा. तसेच रब्बी ज्वारी पेरणीसाठी परभणी मोती, परभणी सुपर मोती, मालदांडी (एम- ३५-१), परभणी ज्योती,
परभणी शक्ती, अकोला क्रांति, फुले यशोदा, फुले माऊली या वाणांपैकी एका वाणाची निवड
करावी.
करडई
जमीनीची व वाणांची निवड
करडई पिकाच्या लागवडीसाठी मध्यम ते भारी, खोल जमीन निवडावी. ४५ सें. मी. पेक्षा
जास्त खोल जमिनीत करडईचे पीक चांगले येते. त्याचप्रमाणे जमीन पाण्याचा निचरा
होणारी आणि ओलावा टिकवून ठेवणारी असावी. सर्वसाधारण
जमीनच सामू ६ ते ८ असावा. थोड़याफार चोपण जमिनीतही हे पीक येऊ शकते. तसेच करडई पेरणीसाठी परभणी कुसुम, परभणी- ८६, फुले कुसुम, शारदा, परभणी- ४० या वाणांपैकी एका वाणाची निवड
करावी.
कांदा
रोपवाटीका तयार करणे
कांदयाची रोपे तयार करण्यासाठी गादी वाफे १ मी रुंद, ३ मी लांब आणि १५ सेमी उंच तयार
करावा. वाफयाच्या रुंदीशी समांतर अशा ५ सेमी बोटाने रेषा पाडाव्यात आणि यामध्ये
बियाणे ओळीत पातळ पेरुन नंतर मातीने झाकुन टाकावे. कांदा लागवडीसाठी ॲग्रीफाउंड डार्क रेड, ॲग्रीफाउंड लाईट रेड, भिमा
रेड, भिमा किरण (लाल कांदा) आणि भिमा स्वेत, भिमा सफेद (पांढरा कांदा) या वाणांचा
वापर करावा.
सिताफळ
फळवाढीची ते काढणी अवस्था
काढणीस तयार असलेल्या सिताफळांची काढणी करुन
घ्यावीत. काढणीनंतर सिताफळ प्रतवारी करुन बाजारपेठेत विक्रीस पाठवावीत. सिताफळ
बागेतील तण व्यवस्थापन करावे.
भाजीपाला
फळधारणा ते फळवाढीची अवस्था
सद्यस्थितीत मिरची पिकामध्ये मर रोगाचा
प्रादुर्भाव दिसून येत असून याच्या व्यवस्थापनासाठी कॉपर ऑक्झिक्लोराईड
५० टक्के ३० ग्रॅम १० लीटर पाण्यात मिसळून
आळवणी करावी. तसेच सध्यस्थितीत
फुलगोभीवर गडडा पोखरणारी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असून
याच्या व्यवस्थापनासाठी मॅलेथीऑन ५० ईसी १५ मीली प्रति १० लिटर पाण्यात
मिसळून फवारणी करावी.
पशुसंवर्धन
सध्यस्थितीत शेळ्यांमध्ये जुलाब/हगवण लागल्याचे
दिसत असुन याच्या व्यवस्थापनासाठी २ चमचे ग्लुकोज, २ चमचे मीठ, २ चमचे
खाण्याचा सोडा, २ चमचे लिंबाचा रस २ लिटर पाण्यामध्ये मिसळून द्रावण
तयार करून आजारी शेळ्यांना पाजावे. तसेच जनावरांच्या खाद्यामध्ये ओल्या चा-याबरोबर
कोरडया चा-याचा समावेश करावा. शेळया व मेंढयांच्या
पिल्लांना पशुवैदयकांच्या सल्ल्याने जंतनाशके दयावीत.
इतर
शेतकरी बांधवांनी पीकांच्या
काढणीनंतर धान्याची योग्यरित्या वाळवणी करुन सुरक्षित ठीकाणी साठवणूक करावी.
परभणी कृषि विद्यापीठाने
विकसित केलेले बायोमिक्स जैविक बुरशीनाशक व कीडनाशक तसेच जैविक संघ (NPK) कृषी विज्ञान केंद्र पैठण
रोड औरंगाबाद येथे विक्रीस उपलब्ध आहे.
सदर कृषि सल्लापत्रिका वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विदयापीठ, परभणी अंतर्गत असलेल्या जिल्हा कृषि हवामान केंद्र (DAMU), कृषि विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर-१ येथील तज्ञ समितीच्या शिफारशी वरून तयार करून प्रसारित करण्यात आलेली आहे.

Comments
Post a Comment